शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -इस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 14:56 IST

 इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.

ठळक मुद्देइस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनारनगराध्यक्षानी दिले जयंतरावांना टोले

इस्लामपूर/सांगली : इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.पाटील म्हणाले, या शहराची नगरपालिका १६८ वर्षांची आहे. राजपत्रात या शहराचे नाव उरुण-इस्लामपूर असे आहे. त्यामुळे फक्त इस्लामपूर असे म्हणणारांनी उरुण-इस्लामपूर पॅटर्न म्हणावे, तसेच कोरोना बाधा आणि संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्री नव्हे तर पंचसूत्रीचा अवलंब करण्यात आला हेसुद्धा लक्षात घ्यावे असा चिमटा पाटील यांनी काढला.

ते म्हणाले, बाधीत व्यक्ती समजल्यावर त्यांची संपर्क साखळी सिद्ध केली. त्यांचे स्क्रिनिंग करून कोणाला घरीच तर कोणाला संस्थात्मक क्वारंटाइन केले. या सर्व व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा घरपोच दिल्या आणि थेट घरभेटीतून त्यांच्यावर उपचार सुरू केले, अशा पंचसूत्रीतून शहराला कोरोना मुक्त करण्यात यश मिळाले आहे.शहराची मातृ संस्था म्हणून नगर पालिकेच्या आरोग्य,पाणी पुरवठा, स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत काम केले. मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी तर कुटुंबाची काळजी न करता चांगले काम केले आहे. पालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे जीवन सुसह्य होईल यासाठी नियोजनपूर्वक पाऊले उचलली, अशा सर्व सामूहिक प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याकडे नगराध्यक्ष पाटील यांनी लक्ष वेधले.ही वेळ नाही..!दरम्यान या बैठकीला उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,नगरसेवक आनंदराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही वेळ श्रेयवादाची नाही, अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवायला हवे. तसेच नागरिकांचे जीवन सुसह्य होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत दोन पाटलांमधल्या श्रेयवादावर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली