शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोरोना घेतोय ट्रॅव्हल्स व्यवसायाचाही बळी, धावणारी चाके पुन्हा रुतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाचा बहर ओसरताच फिरू लागलेली ट्रॅव्हल्सची चाके आता पुन्हा रुतली आहेत. मुंबई-पुण्यासह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू ...

सांगली : कोरोनाचा बहर ओसरताच फिरू लागलेली ट्रॅव्हल्सची चाके आता पुन्हा रुतली आहेत. मुंबई-पुण्यासह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रवास टाळण्याकडे प्रवाशांचा कल आहे. याचा मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यवसायाला बसला आहे.

कोरोनाचा संसर्ग ओसरताच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एसटी सुरू होण्यापूर्वी ट्रॅव्हल्स धावायला लागल्या. रेल्वे बंद असल्याचा फायदा ट्रॅव्हल्सला मिळाला. गेल्या तीन-चार महिन्यांत या व्यवसायाला सूर गवसला होता. मुंबई, पुणे, नागपूर, अैारंगाबाद, नांदेड, सोलापूर, लातूर यासह बंगलोर, मंगलोर, बेळगावकडे गाड्यांचा ओघ सुरू झाला होता. सांगली-मिरजेतून दररोज ५५ गाड्या धावत होत्या.

पंधरवड्यापासून याला खो बसला आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रवासी संख्या झपाट्याने खालावली. विशेषत: नागपूरच्या गाड्यांना ब्रेक लागला. तेथे कोरोना संसर्ग वाढू लागल्याने तसेच लॉकडाऊनच्या संकेतांमुळे प्रवाशांनी प्रवास थांबविला. त्यानंतर मुंबई व पुण्याच्या गाड्या रिकाम्या होऊ लागल्या. आता जेमतेम दहा ते पंधरा गाड्या धावत आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी न मिळाल्याने ऐनवेळेस रद्द कराव्या लागत आहेत. डिझेलचे दर वाढल्याने दहा-पंधरा प्रवाशांवर गाडी पळविणे परवडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांनाही महिन्याभरापासून ब्रेक लागला आहे. कर्नाटकात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी प्रमाणपत्र द्यावे लागते, त्यामुळे प्रवासी घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. विेशेषत: बंगलोर व मंगलोरला जिल्ह्यातून बरेच प्रवासी जायचे. या सर्वांनी आता प्रवास स्थगित केला आहे.

चौकट

धावणारी चाके पुन्हा रुतली

जानेवारीपासून ट्रॅव्हल्स व्यवसायाने जम धरला होता. चाके फिरू लागली होती. नोकरी, व्यवसाय-उदीम आणि लग्नकार्यांच्या निमित्ताने प्रवासी ट्रॅव्हल्सकडे येत होते. ही संख्या आता झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: विदर्भात संपूर्ण लॉकडाऊन कधीही जाहीर होण्याच्या भीतीने प्रवासी तिकडे जायला तयार नाहीत. या स्थितीत गाड्या पार्किंगमध्ये लावण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.

पॉईंटर्स

कोरोनाआधी बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - ५५

सध्याची संख्या - १५

कोट

सूर धरलेल्या व्यवसायाने पुन्हा मान टाकली आहे. कोरोना कमी झाल्याने प्रवासी येऊ लागले होते. आता दिवसभरात अर्ध्या गाडीचे प्रवासीही मिळत नाहीत. आठवड्यातून एखादी-दुसरी गाडी निघते. रुग्णसंख्या वाढतच असल्याने पुन्हा लॉकडाऊन व धंदा बंद राहण्याची भीती आहे.

- राहूल मोरे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

- गेल्या वर्षी नवी गाडी घेतली होती, त्यानंतर महिन्याभरातच लॉकडाऊन सुरू झाले. बॅंकेचे कर्जफेडीचे हप्ते भरेपर्यंत दिवाळे निघायची वेळ आली. या सिझनला थोड्याफार व्यवसायाची आशा होती; पण कोरोना फैलावत असल्याने धंदा पुन्हा बसला आहे. लग्नसोहळ्यांवरील निर्बंधांचाही फटका बसला आहे. दररोजच्या खर्चापुरतेही उत्पन्न मिळेना झाले आहे.

- आप्पासाहेब खरात, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

- सर्वाधिक व्यवसाय असणाऱ्या मुंबई, पुणे, अैारंगाबाद व बंगलोर शहरांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. प्रत्येक गाडीला दहा-पंधरा प्रवासी घेऊन जाणे परवडत नाही. डिझेलचे दर वाढल्यानेही व्यवसाय हाताबाहेर चालला आहे. दोन महिन्यांपासून जम बसू लागला होता. आता पुन्हा गेल्यावर्षीच्या मार्चसारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे.

- केशव राव, ट्रॅव्हल्स व्यावसायिक संघटना