शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कोरोना घेतोय ट्रॅव्हल्स व्यवसायाचाही बळी, धावणारी चाके पुन्हा रुतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाचा बहर ओसरताच फिरू लागलेली ट्रॅव्हल्सची चाके आता पुन्हा रुतली आहेत. मुंबई-पुण्यासह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू ...

सांगली : कोरोनाचा बहर ओसरताच फिरू लागलेली ट्रॅव्हल्सची चाके आता पुन्हा रुतली आहेत. मुंबई-पुण्यासह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रवास टाळण्याकडे प्रवाशांचा कल आहे. याचा मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यवसायाला बसला आहे.

कोरोनाचा संसर्ग ओसरताच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एसटी सुरू होण्यापूर्वी ट्रॅव्हल्स धावायला लागल्या. रेल्वे बंद असल्याचा फायदा ट्रॅव्हल्सला मिळाला. गेल्या तीन-चार महिन्यांत या व्यवसायाला सूर गवसला होता. मुंबई, पुणे, नागपूर, अैारंगाबाद, नांदेड, सोलापूर, लातूर यासह बंगलोर, मंगलोर, बेळगावकडे गाड्यांचा ओघ सुरू झाला होता. सांगली-मिरजेतून दररोज ५५ गाड्या धावत होत्या.

पंधरवड्यापासून याला खो बसला आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रवासी संख्या झपाट्याने खालावली. विशेषत: नागपूरच्या गाड्यांना ब्रेक लागला. तेथे कोरोना संसर्ग वाढू लागल्याने तसेच लॉकडाऊनच्या संकेतांमुळे प्रवाशांनी प्रवास थांबविला. त्यानंतर मुंबई व पुण्याच्या गाड्या रिकाम्या होऊ लागल्या. आता जेमतेम दहा ते पंधरा गाड्या धावत आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी न मिळाल्याने ऐनवेळेस रद्द कराव्या लागत आहेत. डिझेलचे दर वाढल्याने दहा-पंधरा प्रवाशांवर गाडी पळविणे परवडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांनाही महिन्याभरापासून ब्रेक लागला आहे. कर्नाटकात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी प्रमाणपत्र द्यावे लागते, त्यामुळे प्रवासी घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. विेशेषत: बंगलोर व मंगलोरला जिल्ह्यातून बरेच प्रवासी जायचे. या सर्वांनी आता प्रवास स्थगित केला आहे.

चौकट

धावणारी चाके पुन्हा रुतली

जानेवारीपासून ट्रॅव्हल्स व्यवसायाने जम धरला होता. चाके फिरू लागली होती. नोकरी, व्यवसाय-उदीम आणि लग्नकार्यांच्या निमित्ताने प्रवासी ट्रॅव्हल्सकडे येत होते. ही संख्या आता झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: विदर्भात संपूर्ण लॉकडाऊन कधीही जाहीर होण्याच्या भीतीने प्रवासी तिकडे जायला तयार नाहीत. या स्थितीत गाड्या पार्किंगमध्ये लावण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.

पॉईंटर्स

कोरोनाआधी बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - ५५

सध्याची संख्या - १५

कोट

सूर धरलेल्या व्यवसायाने पुन्हा मान टाकली आहे. कोरोना कमी झाल्याने प्रवासी येऊ लागले होते. आता दिवसभरात अर्ध्या गाडीचे प्रवासीही मिळत नाहीत. आठवड्यातून एखादी-दुसरी गाडी निघते. रुग्णसंख्या वाढतच असल्याने पुन्हा लॉकडाऊन व धंदा बंद राहण्याची भीती आहे.

- राहूल मोरे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

- गेल्या वर्षी नवी गाडी घेतली होती, त्यानंतर महिन्याभरातच लॉकडाऊन सुरू झाले. बॅंकेचे कर्जफेडीचे हप्ते भरेपर्यंत दिवाळे निघायची वेळ आली. या सिझनला थोड्याफार व्यवसायाची आशा होती; पण कोरोना फैलावत असल्याने धंदा पुन्हा बसला आहे. लग्नसोहळ्यांवरील निर्बंधांचाही फटका बसला आहे. दररोजच्या खर्चापुरतेही उत्पन्न मिळेना झाले आहे.

- आप्पासाहेब खरात, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

- सर्वाधिक व्यवसाय असणाऱ्या मुंबई, पुणे, अैारंगाबाद व बंगलोर शहरांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. प्रत्येक गाडीला दहा-पंधरा प्रवासी घेऊन जाणे परवडत नाही. डिझेलचे दर वाढल्यानेही व्यवसाय हाताबाहेर चालला आहे. दोन महिन्यांपासून जम बसू लागला होता. आता पुन्हा गेल्यावर्षीच्या मार्चसारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे.

- केशव राव, ट्रॅव्हल्स व्यावसायिक संघटना