जिल्ह्यात ९३० जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:03+5:302021-06-26T04:20:03+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली सहा, मिरज दोन, वाळवा, तासगाव प्रत्येकी ...

जिल्ह्यात ९३० जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली सहा, मिरज दोन, वाळवा, तासगाव प्रत्येकी तीन, जत दोन, कडेगाव, शिराळा, पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या आठ हजार ३५७ रुग्णांपैकी ९९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ८४३ जण ऑक्सिजनवर, तर १५१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आराेग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५७८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३४७ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७८८५ जणांच्या तपासणीतून ६०९ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील पाचजणांचा मृत्यू झाला, तर नवे २६ जण उपचारांसाठी जिल्ह्यात दाखल झाले.
चौकट -
आतापर्यंतचे एकूण बाधित १४०७५५
उपचार घेत असलेले ८३५७
कोरोनामुक्त झालेले १२८४११
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३९८७
पॉझिटिव्हिटी रेट ९.१३
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ११०
मिरज ४२
आटपाडी ४७
कडेगाव ७५
खानापूर ८१
पलूस ६१
तासगाव ४८
जत ३६
कवठेमहांकाळ ३३
मिरज तालुका १०९
शिराळा ५२
वाळवा २३६
चौकट
म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात नवे सात रुग्ण आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २७७ बाधित आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.