शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पोषण आहाराचे महत्त्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:29 IST

शिराळा : पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले. शिराळा येथील ...

शिराळा : पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले.

शिराळा येथील शेतकरी बचत भवनात आयोजित एकात्मिक बाल विकास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पोषण मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्यास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरे म्हणाल्या, महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरू असलेले पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण व मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करायचे असेल, तर सकस आहाराची आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. हे जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.

यावेळी त्यांनी अनुराधा देशपांडेलिखित पथनाट्याचे सादरीकरण आणि व प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण पाककृतीबद्दल सर्वांचे कौतुक केले.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, प्रकल्प अधिकारी सतीश नवले, सारिका पाटील, डॉ. मनीषा यादव, शैलजा काकडे, अनुराधा देशपांडे, मनीषा पाटील, विद्या पाटील, संगीता जानकर, अरुण पाटील उपस्थित होते.