शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

संभाजी पवार : साखर सम्राटांमुळे निर्माण होताहेत वाद

सांगली : शेतकरी संघटनांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखरसम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही चळवळ खिळखिळी करण्याचे षड्यंत्र आहे. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, रघुनाथदादा पाटील, बाळासाहेब मासुले, संजय कोले, महावीर चव्हाण, बाबू काका सायमोते, एम. के. गुरव, बाळासाहेब कुलकर्णी यासारखे नेते शेतकरी चळवळीत अग्रभागी राहिले. ऊस, दूध यांचे दर, झोनबंदी यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे बळिराजाच्या जीवनात क्रांती घडली. दहा-बारा वर्षाच्या काळात ऊसदरवाढीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना घामाचे ३२ हजार २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काची व जादा रक्कम मिळाली. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास, लाठीहल्ला सहन केला. चळवळीला इतका मोठा इतिहास असताना अचानक संघटनेअंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. या संघटनांनी साखरसम्राटांच्या या प्रयत्नांना बळी पडू नये. जोपर्यंत शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. साखरसम्राटांच्या बंदुकीला शेतकरी नेत्यांनी आपला खांदा द्यावा व त्या बंदुकीने दुसऱ्या शेतकरी नेत्यांवर निशाणा साधावा, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शत्रूचा स्वार्थ साधला जाईल. व्यक्ती तितक्या प्रकृती या नैसर्गिक न्यायाने चळवळीतील नेते व संघटना अनेक असणे हे स्वभाविक आहे. मी या सर्वांचा आदर करतो. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले योगदान मोठे आहे. आपापसातील मतभेदांपेक्षा शेतकरी हित जोपासणे हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उसाला दर : संघटनांचे यशस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. हे चळवळीला आलेले यश आहे, असे पवार म्हणाले. संघटनांचे हे यश साखर सम्राटांच्या पचनी पडत नसल्यामुळे ते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत भांडण लावत आहेत. याला शेतकरी फसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.