शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

संभाजी पवार : साखर सम्राटांमुळे निर्माण होताहेत वाद

सांगली : शेतकरी संघटनांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखरसम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही चळवळ खिळखिळी करण्याचे षड्यंत्र आहे. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, रघुनाथदादा पाटील, बाळासाहेब मासुले, संजय कोले, महावीर चव्हाण, बाबू काका सायमोते, एम. के. गुरव, बाळासाहेब कुलकर्णी यासारखे नेते शेतकरी चळवळीत अग्रभागी राहिले. ऊस, दूध यांचे दर, झोनबंदी यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे बळिराजाच्या जीवनात क्रांती घडली. दहा-बारा वर्षाच्या काळात ऊसदरवाढीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना घामाचे ३२ हजार २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काची व जादा रक्कम मिळाली. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास, लाठीहल्ला सहन केला. चळवळीला इतका मोठा इतिहास असताना अचानक संघटनेअंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. या संघटनांनी साखरसम्राटांच्या या प्रयत्नांना बळी पडू नये. जोपर्यंत शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. साखरसम्राटांच्या बंदुकीला शेतकरी नेत्यांनी आपला खांदा द्यावा व त्या बंदुकीने दुसऱ्या शेतकरी नेत्यांवर निशाणा साधावा, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शत्रूचा स्वार्थ साधला जाईल. व्यक्ती तितक्या प्रकृती या नैसर्गिक न्यायाने चळवळीतील नेते व संघटना अनेक असणे हे स्वभाविक आहे. मी या सर्वांचा आदर करतो. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले योगदान मोठे आहे. आपापसातील मतभेदांपेक्षा शेतकरी हित जोपासणे हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उसाला दर : संघटनांचे यशस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. हे चळवळीला आलेले यश आहे, असे पवार म्हणाले. संघटनांचे हे यश साखर सम्राटांच्या पचनी पडत नसल्यामुळे ते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत भांडण लावत आहेत. याला शेतकरी फसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.