शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

संभाजी पवार : साखर सम्राटांमुळे निर्माण होताहेत वाद

सांगली : शेतकरी संघटनांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखरसम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही चळवळ खिळखिळी करण्याचे षड्यंत्र आहे. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, रघुनाथदादा पाटील, बाळासाहेब मासुले, संजय कोले, महावीर चव्हाण, बाबू काका सायमोते, एम. के. गुरव, बाळासाहेब कुलकर्णी यासारखे नेते शेतकरी चळवळीत अग्रभागी राहिले. ऊस, दूध यांचे दर, झोनबंदी यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे बळिराजाच्या जीवनात क्रांती घडली. दहा-बारा वर्षाच्या काळात ऊसदरवाढीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना घामाचे ३२ हजार २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काची व जादा रक्कम मिळाली. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास, लाठीहल्ला सहन केला. चळवळीला इतका मोठा इतिहास असताना अचानक संघटनेअंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. या संघटनांनी साखरसम्राटांच्या या प्रयत्नांना बळी पडू नये. जोपर्यंत शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. साखरसम्राटांच्या बंदुकीला शेतकरी नेत्यांनी आपला खांदा द्यावा व त्या बंदुकीने दुसऱ्या शेतकरी नेत्यांवर निशाणा साधावा, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शत्रूचा स्वार्थ साधला जाईल. व्यक्ती तितक्या प्रकृती या नैसर्गिक न्यायाने चळवळीतील नेते व संघटना अनेक असणे हे स्वभाविक आहे. मी या सर्वांचा आदर करतो. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले योगदान मोठे आहे. आपापसातील मतभेदांपेक्षा शेतकरी हित जोपासणे हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उसाला दर : संघटनांचे यशस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. हे चळवळीला आलेले यश आहे, असे पवार म्हणाले. संघटनांचे हे यश साखर सम्राटांच्या पचनी पडत नसल्यामुळे ते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत भांडण लावत आहेत. याला शेतकरी फसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.