शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जागेसाठी झटली; सांगलीत काँग्रेस एकवटली, गट-तट बाजूला करीत अस्तित्वासाठी संघर्ष

By अविनाश कोळी | Updated: April 11, 2024 12:35 IST

जागावाटपात ते अखेर कमी पडले; पण लढा देताना काँग्रेसला गटबाजीच्या ग्रहणातून बाहेर काढून एकवटण्यात त्यांना यश मिळाले.

अविनाश कोळीसांगली : गटतट, वादविवाद, कुरघोड्या, छुप्या संघर्षाचे दीर्घ ग्रहण जिल्हा काँग्रेसने आजवर सोसले. नुकसानाच्या अनेक कहाण्याही काँग्रेसच्या प्रवासात नोंदल्या गेल्या. या कहाण्यांना दफन करीत काँग्रेसमधील नव्या पिढीतील नेत्यांनी एकत्र येत पक्षाला सांगलीची जागा मिळावी म्हणून लढा उभारला. पक्षाच्या राज्य व केंद्र स्तरावरील मैदानापर्यंत षट्कार खेचून दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. जागावाटपात ते अखेर कमी पडले; पण लढा देताना काँग्रेसला गटबाजीच्या ग्रहणातून बाहेर काढून एकवटण्यात त्यांना यश मिळाले.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या जुन्या पिढीतील नेत्यांच्या निधनानंतर आता नव्या पिढीच्या हाती पक्षाचे दोर आले आहेत. गेल्या दहा वर्षांत डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख, हाफिज धत्तुरे या काँग्रेस नेत्यांच्या निधनाने पक्षाला मोठे धक्के बसले. मात्र, त्यातून सावरत आता नव्या पिढीतील काँग्रेसचे नेते एकवटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पक्षाचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील असताना त्यांचा जिल्ह्यावर अंमल होता. पण, दुसऱ्या पिढीत प्रकाशबापू पाटील, मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात जिल्ह्याच्या नेतृत्वावरून सुप्त संघर्ष होता. निवडणुकांमधील पराभवाच्या कारणावरून काँग्रेसअंतर्गत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला. सत्य काहीही असले तरी यामुळे जिल्हा काँग्रेस सतत गटबाजीत विभागलेली दिसून आली. पक्षाच्या बैठकांनाच एकत्र येण्याची औपचारिकता दाखविली जात होती. पाच वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनी सांगलीत येऊन काँग्रेसमधील गटबाजीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दीर्घकाळ काँग्रेसच्या गटबाजीची चर्चा राजकीय पटलावर होत राहिली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसअंतर्गत वातावरणाने १८०च्या कोनात वळण घेतले आहे. कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसचे नवे चित्र रेखाटले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा मिळावी म्हणून याच काँग्रेसमधील नव्या पिढीने दिल्लीपर्यंत एकत्रित संघर्ष केला. या लढाईत त्यांच्या वाट्याला अपयश आले; पण नेत्यांचा एकसंध लढा सुरू आहे. त्यामुळे विभागलेले कार्यकर्तेही एकवटल्याचे चित्र अनेक वर्षांनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये दिसू लागले आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्हा काँग्रेसचे नेते व आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील व जितेश कदम आदी नेते या लढाईच्या निमित्ताने एकवटले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळविल्यानंतर सांगलीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा घेण्यात आली होती. त्यावेळीही काँग्रेस नेत्यांनी अशीच एकजूट दाखविली होती. मात्र, कार्यकर्त्यांना त्यावेळी ती औपचारिकता वाटली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sangli-pcसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमvishal patilविशाल पाटील