शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

स्वाभिमानीच्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:39 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी विधानसभेच्या सांगली जिल्ह्यातील मिरज, जत आणि खानापूरची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे केल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देस्वाभिमानीच्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थकाँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी विधानसभेच्या सांगली जिल्ह्यातील मिरज, जत आणि खानापूरची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे केल्याचे जाहीर केले.

शेट्टी यांनी मिरज व जत विधानसभा मतदारसंघाचा शनिवारी दौरा करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. हक्काचे मतदारसंघच काँग्रेसने मित्रपक्षांना सोडले, तर पक्षाचे काय, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आघाडी करण्याचे ठरले आहे. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्षासह अनेक छोटे-मोठे पक्ष व संघटनाही सहभागी आहेत. या मित्रपक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे ५० जागांची मागणी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र ३८ जागा मित्र पक्ष व संघटनांना सोडण्याचे निश्चित केले आहे. दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल. त्यापूर्वी माजी खा. राजू शेट्टी यांनी मिरज, जत व खानापूर विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघातून, तर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नावाची घोषणाही शेट्टी यांनी केली आहे. खानापूर मतदारसंघात काँग्रेसकडून यापूर्वी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१४ च्या निवडणुकीतही पाटील यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढविली होती. त्यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. कारण, पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली नाही. पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, दोन दिवस थांबा, योग्य निर्णय जाहीरच करतो, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसकडून दुसरे उमेदवार राजाराम देशमुख इच्छुक असून, ते प्रदेश काँग्रेसचे सदस्य आहेत. मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थायिक होते. राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. बाबसाहेब मुळीक, आटपाडीचे रावसाहेब पाटील इच्छुक आहेत. या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडल्याच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे.जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम सावंत यांनी भाजपशी कडवी झुंज देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यास सावंत यांना थांबावे लागेल. नाही तर त्यांना विशाल पाटील यांच्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र आमचे स्वतंत्र अस्तित्व असताना अन्य पक्षाला ही जागा सोडू नका, अशी मागणी केली आहे.मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. सिध्दार्थ जाधव, राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता दलानेही दावा केला आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू आहे. तथापि मिरजेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना अथवा जनता दलाकडे जाणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगली