शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 17:21 IST

पक्षांतरामुळे अजित पवारांना आरक्षणाचा विसर

विटा : आताच्या राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने सरकारचे घोडे मारलेय काय, असा संतप्त सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सध्या पक्षांतर केल्यामुळे यापूर्वी आम्ही दिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विसर पडल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.विटा येथे जनसंवाद पदयात्रेच्या कार्यक्रमासाठी आलेले माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आताचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेत असल्याकडेही लक्ष वेधले.चव्हाण म्हणाले, ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्रे, दाखले पुरावे आहेत. त्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब लोक ज्यांना राहायला घर नाही, ते पुरावा कुठे सांभाळत बसणार आहेत. मात्र, अशा पद्धतीने आता मराठवाड्यातील मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केले आहेत.आज सरकार निजामकालीन कागदपत्रे, पुरावे दाखले ग्राह्य धरत आहे; पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही. हा कोणता न्याय आहे असे म्हणत आता दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

अजित पवारांना विसर...कोल्हापूर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हेदेखील दिल्लीतूनच आले. मग त्यांनी का आरक्षण दिले नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर केली होती. त्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यावेळी माझ्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. ते आज माझ्यावर टीका करीत आहेत. कारण त्यांनी आता पक्षांतर केल्यामुळे त्यांना आम्ही दिलेल्या आरक्षणाचा विसर पडला आहे. अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार यांच्यावर केली.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण