शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:26 IST

रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला.

ठळक मुद्देवाद्यांच्या गजरात सांगलीत मिरवणूकआजी-माजी पदाधिकाऱ्यांचाही सहभाग

सांगली : रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला.

निमित्त होते, यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याचे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, राम मंदिर चौक या मार्गावरून मिरवणूकही काढण्यात आली.यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेला तीस लाख रुपयांचा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्त मंगळवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अभियानातील यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हानंद पडळकर, माजी अध्यक्ष देवराज पाटील, स्नेहल पाटील, रेश्माक्का होर्तीकर, बसवराज पाटील, रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राजचा राज्यातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील सर्व पुरस्कार जिल्हा परिषद मिळवेलच, पण यापुढे राष्ट्रीय पातळीवरही चमकेल. या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने जिल्ह्यातील जनतेचा सन्मान केला. देशाचे, राज्याचे नेतृत्व येथून घडते. यापुढेही यशाचा हा वारसा कायम ठेवू. आगामी वर्षात जिल्ह्यातीलच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळेल, असे कामकाज केले जाईल. यानिमित्ताने सर्व गट-तट, पक्ष सोडून एकत्रित येण्याचे हे वातावरण सभागृहातही कायम ठेवू.राऊत म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे कामाची सुरुवात आहे. सामान्य जनतेचे कामातून समाधान होणे, हा खरा मोठा पुरस्कार असून तो पुरस्कारही मिळवण्यासाठी अधिक गतीने काम करू. त्यासाठी यशवंत पंचायत राजप्रमाणेच सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.

माजी अध्यक्षा स्नेहल पाटील म्हणाल्या की, हे यश टीमवर्कचे फळ आहे. एकजुटीने काम केले तर, नक्कीच यश मिळते. जिल्हा परिषदेत चांगल्या कामाचे सातत्य ठेवावे.पुरस्कार स्वीकारण्यासाठी व आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठीही माजी पदाधिकाºयांना आवर्जून बोलावले, याबद्दल अध्यक्ष देशमुख व पदाधिकाºयांचे त्यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास माजी सभापती गजानन कोठावळे, संजीवकुमार सावंत, दत्तात्रय पाटील, किसन जानकर, दत्तात्रय पाटील, जितेंद्र पाटील, अभिजित पाटील, छायाताई खरमाटे, जनार्दन झिंबल, जयश्री पाटील, पवित्रा बरगाले, संयोगीता कोळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, नीलेश घुले, दीपाली पाटील, शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.मिनी मंत्रालय चमकेल : संग्रामसिंह देशमुखजिल्हा परिषदेचा प्रगतीचा आलेख यापुढेही असाच ठेवण्यासाठी विकासाला गती देणार आहे. एवढे चांगले काम करू की, भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही जिल्हा परिषद चमकेल, असा विश्वास अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. जुन्या प्रादेशिक योजनांच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आरोग्य विभागही सक्षम करण्यावर भर असणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न चालू असून, शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.नाराज सदस्यांची चर्चाजिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी अग्रेसर असलेल्या गटाचे सदस्य विजयी रॅलीपासून दूर होते. याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगताच बंड केलेले सदस्य रॅलीत पुन्हा सहभागी झाले. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली