शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:46 IST

'नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत'

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली आहे. यावर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने आ. जयंत पाटील यांनी त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल शासनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ‘जयंत पाटील म्हणजे सरकार नव्हे’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केल्याने दोघा नेत्यांत संघर्ष पेटला आहे.उरूण-इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर यावर आ. जयंत पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत. लोकल बॉडी अस्तित्वात नाही. उरूण-इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी मी आहे, अनेक वर्षे मी येथून निवडून येत आहे. सरकारने माझा विचार घेतला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतरावांच्या टीकेवर उत्तर दिले. येथील जनतेची मागणी असल्याने ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आले आहे. तुम्ही सरकार नाही, नामकरणाविषयी सरकारला विचारले पाहिजे, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

नामांतराचा नवा वाद काय आहे?इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर शहराच्या नावापुढे असणाऱ्या उरूण या नावाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून उरूण-ईश्वरपूर असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. उरूण परिसराला इतिहास आहे. पुरातन कागदपत्रांमध्ये उरूण शहराचा उल्लेख आढळतो. दोन्ही शहरे एकत्रित वसलेली असल्यामुळे जोड शहर म्हणून उरूण-इस्लामपूर अशीच ओळख शहराची आहे.

कधी मैत्री, कधी राजकीय संघर्षजयंत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने संवाद व भेट होत असल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. जयंत पाटील यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण देत पक्षाव्यतिरिक्त वेगळा संवाद असू शकतो, असे सांगितले होते. दोन्ही नेत्यांकडून मैत्रीव पक्षांपलिकडच्या नात्याचा उल्लेख केला गेला. मात्र वादाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांत वाक् युद्ध रंगले आहे.