शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:46 IST

'नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत'

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली आहे. यावर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने आ. जयंत पाटील यांनी त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल शासनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ‘जयंत पाटील म्हणजे सरकार नव्हे’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केल्याने दोघा नेत्यांत संघर्ष पेटला आहे.उरूण-इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर यावर आ. जयंत पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत. लोकल बॉडी अस्तित्वात नाही. उरूण-इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी मी आहे, अनेक वर्षे मी येथून निवडून येत आहे. सरकारने माझा विचार घेतला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतरावांच्या टीकेवर उत्तर दिले. येथील जनतेची मागणी असल्याने ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आले आहे. तुम्ही सरकार नाही, नामकरणाविषयी सरकारला विचारले पाहिजे, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

नामांतराचा नवा वाद काय आहे?इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर शहराच्या नावापुढे असणाऱ्या उरूण या नावाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून उरूण-ईश्वरपूर असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. उरूण परिसराला इतिहास आहे. पुरातन कागदपत्रांमध्ये उरूण शहराचा उल्लेख आढळतो. दोन्ही शहरे एकत्रित वसलेली असल्यामुळे जोड शहर म्हणून उरूण-इस्लामपूर अशीच ओळख शहराची आहे.

कधी मैत्री, कधी राजकीय संघर्षजयंत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने संवाद व भेट होत असल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. जयंत पाटील यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण देत पक्षाव्यतिरिक्त वेगळा संवाद असू शकतो, असे सांगितले होते. दोन्ही नेत्यांकडून मैत्रीव पक्षांपलिकडच्या नात्याचा उल्लेख केला गेला. मात्र वादाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांत वाक् युद्ध रंगले आहे.