शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

कचऱ्यापासून खतनिर्मिती; सांगलीत कचऱ्याचे डंपिंग होतेय बंद, डेपोतून गायब होतोय दुर्गंध

By शीतल पाटील | Updated: August 14, 2023 17:18 IST

समडोळी डेपोतील ३५ टक्के तर बेडगमधील ८५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट

शीतल पाटीलसांगली : महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे संकलन करायचे आणि ते समडोळी, बेडग डेपोवर डंपिंग करायचे, असा पायंडा गेली ३० वर्षे सुरू होता. त्यामुळे या दोन्ही डेपोवर लाखो टन कचरा पडून होता. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा पावले उचलली; पण अडथळ्यांची शर्यत प्रशासन पार करू शकले नाही. आता मात्र या दोन्ही डेपोवरील चित्र पालटले आहे. घनकचरा प्रकल्पांच्या मंजुरीनंतर समडोळी डेपोवरील ३५ टक्के तर बेडग डेपोवरील ८५ टक्के जुन्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात जवळपास नऊ लाख घनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. कित्येक वर्षानंतर या दोन्ही डेपोने मोकळा श्वास घेतला आहे.सांगलीतील कचरा समडोळी हद्दीतील डेपोवर तर मिरज व कुपवाडचा कचरा बेडग हद्दीतील डेपोवर डंपिंग केला जात होता. गेल्या तीस वर्षांत समडोळी डेपोवर सहा लाख ५४ हजार घनमीटर तर बेडग डेपोवर तीन लाख सात हजार घनमीटर असा नऊ लाख ६१ घनमीटर कचरा पडून होता. डेपो परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अनेकदा कचरा जाळल्याने धुराचे लोट तयार होऊन प्रदूषणात वाढ झाली होती. भटक्या कुत्र्यांनी समडोळी, बेडग परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. कचरा डेपो बंद करण्यासाठी आंदोलनेही झाली. अखेर आयुक्त सुनील पवार यांनी रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावला.नव्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्यासाठी ४३ कोटी तर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३६ कोटींची निविदा मंजूर होऊन ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांत या दोन्ही डेपोचा कायापालट झाला आहे. बेडग येथील तीन लाख घनमीटर कचऱ्यापैकी दाेन लाख ५३ हजार घनमीटर तर समडोळी येथील सहा लाख ५४ हजार घनमीटरपैकी दाेन लाख ३० हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही डेपोंनी ३० वर्षांनंतर मोकळा श्वास घेत आहेत.

चार टप्प्यांत होते सेग्रिगेशन

जुन्या कचऱ्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया केली जाते. पहिल्यांदा कचरा जेसीबीच्या साहाय्याने यंत्रात टाकला जातो. पहिल्या टप्प्यात ४०० मिलिमीटरवरील कचऱ्याचे सेग्रिगेशन केले जाते. दुसऱ्या टप्प्यात ८० ते ४०० मिलिमीटर, तिसऱ्या टप्प्यात २० ते ८० मिलिमीटर आणि चौथ्या टप्प्यात २० मिलिमीटर आतील कचऱ्याचे सेग्रिगेशन होते. या साऱ्या प्रक्रियेत दगड, प्लास्टिक वेगवेगळे केले जातात. शेवटच्या टप्प्यात खतनिर्मिती होते.

प्रक्रियेनंतर काय होते?कचऱ्यामधील ज्वलनशील क्षमता असणारे घटक बाजूला केले जातात. याचा वापर सिमेंट कंपन्या, को-जनरेशन प्लॅँटमध्ये बाॅयलर पेटविण्यासाठी होते. सध्या जे. के. सिमेंट, दालमिया सिमेंट यांना हा ज्वलनशील कचरा पुरविला जात आहे.या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना माफत दरात खत दिले जात आहे.बांधकामाचा राडारोडा, दगड, खडी, माती यांचा वापर जमिनीचा भराव करण्यासाठी केला जात आहे.प्लास्टिक, रबर, ग्लास, इत्यादी घेऊन रॅक स्पीकर या कंपनीला दिले जात आहेत.

दररोज चार हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रियागेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दररोज चार हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. दिवसातील १८ तास कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू असते. येत्या दोन ते तीन महिन्यांत दोन्ही डेपोंवरील जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.थर्ड पार्टी ऑडिटसाठी एजन्सी नियुक्तया प्रकल्पाच्या तांत्रिक मूल्यमापनासाठी शासनाच्या नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, नागपूर यांची, तर थर्ड पार्टी ऑडिटसाठी जिजाऊ टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पामुळे जुन्या कचऱ्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. त्यानंतर दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. गेल्या तीस वर्षांचा प्रश्न निकाली निघणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून महापालिकेच्या घंटागाडीकडे द्यावा. - सुनील पवार, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Sangliसांगली