शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अधिकाऱ्यासह चौघांविरोधात फसवणुकीची तक्रार- तासगाव पंचायत समितीकडून अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:56 IST

अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित

ठळक मुद्देमणेराजुरीच्या शेतकऱ्याला पावणेचार लाखांना गंडा

तासगाव : अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकºयाने पंचायत समितीतील एका अधिकाºयासह अभिनव क्रांती या संस्थेच्या तिघांविरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केलेला घोटाळा ‘लोकमत’मधून सर्वप्रथम उघडकीस आणण्यात आला होता.

पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाचे तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर, मालगाव (ता. मिरज) येथील सतीश भूपाल सनदी, राजू भूपाल सनदी आणि हेमंत भंडारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत भाऊसाहेब एरंडोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचायत समितीतील तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर यांनी अभिनव क्रांती या संस्थेकडून अनुदानावर ट्रॅक्टर मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये १ लाख ७५ हजार रुपये रोख, तर २ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्वारे, असे एकूण चार लाख २५ हजार रुपये देण्यात आले होते. ही रक्कम दिल्यानंतर ट्रॅक्टर देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि नांदणीकर यांच्याकडे तगादा लावला होता.

मात्र त्यांच्याकडून ट्रॅक्टर मिळाला नाही. त्याऐवजी २५ आॅक्टोबर २०१७ रोजी २ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. खात्यावर पैसे नसल्याने हा धनादेश बँकेत वठला नाही. त्यानंतर १० एप्रिल २०१८ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेशही वठला नाही.

अनुदानावर ट्रॅक्टर देतो असे सांगून पावणेचार लाख रुपये घेतले. त्यानंतरही ट्रॅक्टर दिलाच नाही. त्याऐवजी पैसे परत देण्यासाठी दिलेले धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे खोटे धनादेश देऊन आणि अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वरील चौघांवर कारवाई करावी व पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी एरंडोले यांनी पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.तासगावात दुसरी तक्रारअभिनव क्रांती संस्थेच्या पदाधिकाºयांविरोधात यापूर्वीही जत तालुक्यातील काही शेतकºयांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. आता तासगाव तालुक्यातील शेतकºयांकडूनदेखील तक्रार दाखल झाली आहे. एकाच शेतकºयाने तक्रार दिली असली तरी, तालुक्यासह जिल्ह्यात फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी