शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हाणामारी संस्कृतीला खाकीची चपराक : तासगावात बदलाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:09 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्टÑवादीत झालेल्या हाणामारीवेळी पोलीसही टार्गेट झाले. त्यामुळे या हाणामारी संस्कृतीला पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारुन चांगलीच चपराक दिली. कारवाईच्या भीतीने अनेकजण धास्तावले असून, गायब झाले आहेत. मात्र या घटनेमुळे तालुक्यातील राजकारण्यांच्या मक्तेदारीला तडा गेला.तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील तथा आबा गट विरुध्द ...

ठळक मुद्देराजकीय मक्तेदारीला तडा; कारभारी धास्तावले, कारवाईने कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्टÑवादीत झालेल्या हाणामारीवेळी पोलीसही टार्गेट झाले. त्यामुळे या हाणामारी संस्कृतीला पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारुन चांगलीच चपराक दिली. कारवाईच्या भीतीने अनेकजण धास्तावले असून, गायब झाले आहेत. मात्र या घटनेमुळे तालुक्यातील राजकारण्यांच्या मक्तेदारीला तडा गेला.

तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील तथा आबा गट विरुध्द खासदार संजयकाका पाटील गट असे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. या दोन्ही गटातच निवडणुका होत असतात. यात दोन्ही गटात अपवाद वगळता कायदा हातात घेण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अडीच वर्षापूर्वी बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि राष्टÑवादीत धुमशान झाले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमध्ये हाणामारी झाली. ग्रामपंचायत निवडणुकीतही काही गावात खुन्नस देण्याचे प्रकार झाले. नुकत्याच झालेल्या प्रभाग सहामधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजप आणि राष्टÑवादीत हाणामारीची पुनरावृत्ती झाली.

निवडणूक आणि हाणामारी हे तालुक्याचे समीकरण झाले होते. यातून अनेक कार्यकर्त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. कायदा हातात घेऊन हम करे सो कायदा, असा अविर्भाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढीस लागला होता. दोन गटात झालेल्या भांडणात प्रशासनाकडून कठोर कारवाईची भूमिका घेण्यात आली नाही. परिणामी तालुक्यात हाणामारी संस्कृती वाढली होती.

पोटनिवडणुकीतील हाणामारीत मात्र कर्तव्य बजावणारे पोलीसच शिकार झाले. त्यावेळी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांना मारहाण केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष, गट-तट न पाहता गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे, तर गुन्हे दाखल झालेल्यांच्या अटकेसाठीही ससेमीरा चालू झाला. पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांची स्टाईल सामान्य तासगावकरांना भावली. राजकीय मक्तेदारी आणि वरदहस्तात वावरणाऱ्या भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांमुळे पळताभुई थोडी झाली. तालुक्यात होणाºया हाणामारीच्या घटनांचा केंद्रबिंदू आतापर्यंत तासगाव शहरातच होता. मात्र हा केंद्रबिंदू खाकीच्या बडग्यामुळे डळमळीत झाला आहे. शहरातील दोन्ही पक्षांतील बडे कार्यकर्ते पोलिसी कारवाईच्या धसक्याने शहरातून पसार झाले आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकीर्दीतदेखील झाली नाही, इतकी मोठी कारवाई यावेळी झाली आहे.राजकारण्यांची तलवार म्यानहाणामारीनंतर राष्टवादीकडून आ. सुमनताई पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. खा. संजयकाकांवर गुन्हा दाखल करावा, अशी प्रमुख मागणी होती. मात्र पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांचे आंदोलन बारगळले. भाजपकडून तहसील कार्यालयासमोर पोलीस अधीक्षकांच्या बदलीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबविले. पोलीसप्रमुखांच्या बदलीचा विषय गुलदस्त्यातच राहिला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेळके यांच्याकडे तपास कायम आहे. मागण्या मान्य न होताच दोन्ही पक्षांकडून आंदोलनाची तलवार म्यान झाली आहे.राजकीय गोटात सन्नाटापोलिसांना मारहाण झाल्याप्रकरणी शंभरजणांवर गुन्हे दाखल झाले. भाजपचे चौघे, तर राष्टÑवादीचे दोघेजण सध्या अटकेत आहेत. अटकेत नसलेले सुमारे १०६ कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्याविरोधातील कलमे गंभीर आहेत. कारवाईच्या धसक्याने ते सध्या तासगावबाहेर आहेत. तूर्तास तरी राजकीय गोटात सन्नाटा आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणPoliceपोलिस