शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विनामोबदला पंचवीस वर्षे कृष्णामाईची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:57 IST

अशोक डोंबाळे । सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा ...

ठळक मुद्देसुशिक्षितांनाही लाजवणारी कामगिरी । स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारकापर्यंत हमालाकडून नियमित सेवा --संडे हटके बातमीफोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

अशोक डोंबाळे ।सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा स्वच्छतादूत सतीश कऱ्याप्पा दुधाळ यांच्या मनावर प्रभाव आहे. त्यामुळेच ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील कृष्णा नदी आणि स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारक परिसराची अखंडित पंचवीस वर्षे विनामोबदला स्वच्छता करीत आहेत. फोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

चाळीसवर्षीय सतीश दुधाळ येथील जामवाडीत राहतात. शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत झाले आहे. घरच्या दारिद्र्यामुळे शिक्षण न घेता खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्यांना गणपती पेठेत हमालीचे काम करावे लागले. मात्र त्यांनी कधीही परिस्थितीचे भांडवल केले नाही. स्वत:ला शिक्षण घेता आले नाही, म्हणून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित बनविण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर त्यांना लहान वयापासूनच सामाजिक कार्याची ओढ लागली. सतीश वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील स्वामी समर्थ घाट येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात. तेव्हापासून ते सकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात. एका हातात झाडू आणि दुसºया हातात डस्टबिन घेऊन, जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात.

मागील पंचवीस वर्षापासून ते कृष्णामाईची स्वच्छता करीत आहेत. रोज सकाळी सहा ते सातपर्यंत स्वच्छता अभियान राबविणे, हा त्यांचा नित्यक्रम आहे. रोज शंभर ते दीडशे किलो कचरा गोळा करून कुंडीत टाकत आहेत. स्वच्छता करीत असताना अनेक वाईट प्रसंगही आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अनेक सुशिक्षित लोक गुटखा, मावा खाऊन मी स्वच्छता करीत असताना समोरच पिचकाºया, प्लास्टिकच्या रिकाम्या पुड्या टाकतात. खूप वाईट वाटते. हे लोक मानसिकदृष्ट्या कधी सुशिक्षित होतील, असा प्रश्न पडतो. काहीजण पूजेचे साहित्य टाकतात. अशिक्षितांना सांगून पटते. ते नदीपात्राबाहेर निर्माल्य ठेवतात. पण, सुशिक्षित मंडळींना सांगूनही पटत नसल्यामुळे ते नदीतच टाकतात.

सतीश यांची मालवाहतुकीची तीनचाकी सायकल आहे. या सायकलवरही त्यांनी ‘आपली कृष्णामाई स्वच्छ कृष्णामाई’, ‘जल है तो कल है’ असा संदेश मोठ्या अक्षरात लिहिला आहे. संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे, या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वच्छता अभियानात ऊर्मीने काम करतात. अनेक स्वच्छता दूत तयार करायचे आहेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल, तेव्हाच ही भूमी कचरामुक्त होईल, असेही त्यांचे मत आहे.डस्टबिनची साथ सोडली नाहीसध्या काहीजण स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरते करतात. मात्र सतीश कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असते. ते रस्त्यावरील व रेल्वेने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील पंचवीस वर्षांपासून सुरू आहे.स्वच्छतेसाठी अनेकांची मदतकिसन जाधव, तात्या शिंदे, सुभाष सदलगे हेही कृष्णामाईची स्वच्छता करीत होते. या ज्येष्ठांचा आदर्श आणि महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश यामुळेच मलाही स्वच्छतेची आवड निर्माण झाली. सरकार ग्रुप, कृष्णामाई जलतरण संस्थेच्या पदाधिकाºयांचाही कृष्णा नदी परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. कृष्णामाई जलतरण संस्थेचा मी सध्या सदस्य झालो आहे. विजय कडणे आणि आभाळमाया फौंडेशनचे संस्थापक प्रमोद चौगुले यांनी वेळोवेळी पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे स्वच्छता अभियानास बळ मिळाले आहे, असे सतीश दुधाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :SangliसांगलीriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान