शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

सांगलीत विनामोबदला पंचवीस वर्षे कृष्णामाईची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:57 IST

अशोक डोंबाळे । सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा ...

ठळक मुद्देसुशिक्षितांनाही लाजवणारी कामगिरी । स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारकापर्यंत हमालाकडून नियमित सेवा --संडे हटके बातमीफोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

अशोक डोंबाळे ।सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा स्वच्छतादूत सतीश कऱ्याप्पा दुधाळ यांच्या मनावर प्रभाव आहे. त्यामुळेच ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील कृष्णा नदी आणि स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारक परिसराची अखंडित पंचवीस वर्षे विनामोबदला स्वच्छता करीत आहेत. फोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

चाळीसवर्षीय सतीश दुधाळ येथील जामवाडीत राहतात. शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत झाले आहे. घरच्या दारिद्र्यामुळे शिक्षण न घेता खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्यांना गणपती पेठेत हमालीचे काम करावे लागले. मात्र त्यांनी कधीही परिस्थितीचे भांडवल केले नाही. स्वत:ला शिक्षण घेता आले नाही, म्हणून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित बनविण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर त्यांना लहान वयापासूनच सामाजिक कार्याची ओढ लागली. सतीश वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील स्वामी समर्थ घाट येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात. तेव्हापासून ते सकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात. एका हातात झाडू आणि दुसºया हातात डस्टबिन घेऊन, जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात.

मागील पंचवीस वर्षापासून ते कृष्णामाईची स्वच्छता करीत आहेत. रोज सकाळी सहा ते सातपर्यंत स्वच्छता अभियान राबविणे, हा त्यांचा नित्यक्रम आहे. रोज शंभर ते दीडशे किलो कचरा गोळा करून कुंडीत टाकत आहेत. स्वच्छता करीत असताना अनेक वाईट प्रसंगही आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अनेक सुशिक्षित लोक गुटखा, मावा खाऊन मी स्वच्छता करीत असताना समोरच पिचकाºया, प्लास्टिकच्या रिकाम्या पुड्या टाकतात. खूप वाईट वाटते. हे लोक मानसिकदृष्ट्या कधी सुशिक्षित होतील, असा प्रश्न पडतो. काहीजण पूजेचे साहित्य टाकतात. अशिक्षितांना सांगून पटते. ते नदीपात्राबाहेर निर्माल्य ठेवतात. पण, सुशिक्षित मंडळींना सांगूनही पटत नसल्यामुळे ते नदीतच टाकतात.

सतीश यांची मालवाहतुकीची तीनचाकी सायकल आहे. या सायकलवरही त्यांनी ‘आपली कृष्णामाई स्वच्छ कृष्णामाई’, ‘जल है तो कल है’ असा संदेश मोठ्या अक्षरात लिहिला आहे. संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे, या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वच्छता अभियानात ऊर्मीने काम करतात. अनेक स्वच्छता दूत तयार करायचे आहेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल, तेव्हाच ही भूमी कचरामुक्त होईल, असेही त्यांचे मत आहे.डस्टबिनची साथ सोडली नाहीसध्या काहीजण स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरते करतात. मात्र सतीश कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असते. ते रस्त्यावरील व रेल्वेने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील पंचवीस वर्षांपासून सुरू आहे.स्वच्छतेसाठी अनेकांची मदतकिसन जाधव, तात्या शिंदे, सुभाष सदलगे हेही कृष्णामाईची स्वच्छता करीत होते. या ज्येष्ठांचा आदर्श आणि महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश यामुळेच मलाही स्वच्छतेची आवड निर्माण झाली. सरकार ग्रुप, कृष्णामाई जलतरण संस्थेच्या पदाधिकाºयांचाही कृष्णा नदी परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. कृष्णामाई जलतरण संस्थेचा मी सध्या सदस्य झालो आहे. विजय कडणे आणि आभाळमाया फौंडेशनचे संस्थापक प्रमोद चौगुले यांनी वेळोवेळी पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे स्वच्छता अभियानास बळ मिळाले आहे, असे सतीश दुधाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :SangliसांगलीriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान