शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:31 IST

सांगली : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनपातळीवरून नियोजन करण्यात येत आहे. तरीही ...

सांगली : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनपातळीवरून नियोजन करण्यात येत आहे. तरीही दुष्काळ निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. जिल्ह्यात चार ठिकाणी चारा छावण्या सुरु असल्या तरी, जनावरांची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यास मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनास दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी आॅडिओ ब्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सरपंचांनी आपल्या भागातील अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. प्रस्ताव आल्यानंतर चारा छावण्या मंजूर करण्यात याव्यात, पाण्याचे टँकर सुरू करावेत व सध्या कार्यान्वित असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीची कामे केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे सरपंचांनी सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या.दुष्काळ निवारणाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांच्या नियोजनाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या चार चारा छावण्या सुरू असल्या तरी, जनावरांची संख्या लक्षात घेऊन छावण्यांना मंजुरी देण्याचेही आदेश त्यांनी दिले.दरम्यान, जिल्ह्यात १७६ गावे व १०८३ वाड्या-वस्त्यांवर १८३ टॅँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात तीन शासकीय, तर एका सेवाभावी संस्थेच्यावतीने, अशा चार चारा छावण्या सुरु आहेत. यात मोठी जनावरे १ हजार ४१८, तर लहान ३२२ अशी १ हजार ७४० जनावरे दाखल असल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली.यावेळी मुंबईमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता, मंत्रालयीन अधिकारी, तर सांगलीत निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.मागणी असल्यास तात्काळ टँकर द्याटँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. विहिरी अथवा तलावामधील जलस्रोतांचा वापर करण्यासाठी जल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचा अहवाल घेऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.