शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:39 IST

कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी

ठळक मुद्देआढावा बैठक : विश्वजित कदम यांच्यासमोर तक्रारींचा पाऊस ताकारी, टेंभू योजनांकडील अधिकाऱ्यांबाबत नाराजी

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना चांगलेच सुनावले. नोटिसा तात्काळ मागे घ्या आणि मागेल तेथे त्वरित टँकर सुरू करा, अशी सूचना त्यांनी दिली.येथे तहसील कार्यालयात जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्यासाठी गुरुवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आ. मोहनराव कदम, शांताराम कदम, प्रांताधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार अर्चना शेटे, कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, ताकारी योजनेचे प्रकाश पाटील, टेंभू योजनेकडील नरेंद्र घार्गे, मुख्याधिकारी चरण कोल्हे आदी प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजना व महावितरणच्या अनागोंदी कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बोंबाळेवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याचे कसलेही नियोजन नाही. सुर्ली व कामथी कालव्यांना एकाचवेळी पाणी सोडल्यामुळे गैरसोय होते. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. यावेळी विश्वजित कदम यांनी, तात्काळ लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

टेंभू योजनेच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याबाबत तक्रार करताच त्याची चौकशी करण्याचे आदेश कदम यांनी अधिकाºयांना दिले. बोंबाळेवाडी तलावातून रायगाव येथे केवळ ५०० मीटर उचलल्यास रायगाव, बोंबाळेवाडी व शाळगावची सुमारे एक हजार २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. पण, यासाठी अधिकाºयांकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. यावेळी कदम यांनी, खेराडे-विटा येथे टँकर सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, दुष्काळी परिस्थितीत पाटबंधारे विभागाने शेतकºयांना काढलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या, बंद झालेली ताकारी योजना तात्काळ सुरू करा, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.

ताकारी व टेंभू योजनेची पाणीपट्टी योग्य प्रमाणात आकारली जात नसून, ऊस पिकाव्यतिरिक्त अन्य पिकांच्या पाणीपट्टी कपातीचे कोणतेही नियोजन नाही. पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन नसल्याने कोणालाही व्यवस्थित पाणी मिळत नसल्याची तक्रार यावेळी शेतकºयांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून तडसर या गावाचा पाणीप्रश्न अनुत्तरीत आहे, महावितरणकडून नवीन वीज जोडणी जाणीवपूर्वक रोखली जात आहे, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील पथदिव्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, गावात वायरमन नाहीत, अशा अनेक तक्रारी यावेळी लोकांनी उपस्थित केल्या.

यावर विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना, अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाºयांनीसुद्धा यातील जास्तीत जास्त प्रश्न येत्या काही दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, विठ्ठल मुळीक, वैभव पवार, रायगावचे सरपंच समाधान घाडगे, बंडा पवार, सुरेश मुळीक, कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, नगरसेवक सागर सूर्यवंशी, अमरापूरचे सरपंच सुनील पाटील, मालन मोहिते, परशुराम माळी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘सोनहिरा’मार्फत ढाणेवाडीत चारा छावणीढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी सोनहिरा कारखान्यामार्फत चारा छावणी सुरू करणार आहे, अशी घोषणा आ. डॉ. कदम यांनी केली.

कडेगाव येथे गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत आ. डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, मालनताई मोहिते उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना