शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:39 IST

कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी

ठळक मुद्देआढावा बैठक : विश्वजित कदम यांच्यासमोर तक्रारींचा पाऊस ताकारी, टेंभू योजनांकडील अधिकाऱ्यांबाबत नाराजी

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना चांगलेच सुनावले. नोटिसा तात्काळ मागे घ्या आणि मागेल तेथे त्वरित टँकर सुरू करा, अशी सूचना त्यांनी दिली.येथे तहसील कार्यालयात जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्यासाठी गुरुवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आ. मोहनराव कदम, शांताराम कदम, प्रांताधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार अर्चना शेटे, कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, ताकारी योजनेचे प्रकाश पाटील, टेंभू योजनेकडील नरेंद्र घार्गे, मुख्याधिकारी चरण कोल्हे आदी प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजना व महावितरणच्या अनागोंदी कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बोंबाळेवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याचे कसलेही नियोजन नाही. सुर्ली व कामथी कालव्यांना एकाचवेळी पाणी सोडल्यामुळे गैरसोय होते. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. यावेळी विश्वजित कदम यांनी, तात्काळ लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

टेंभू योजनेच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याबाबत तक्रार करताच त्याची चौकशी करण्याचे आदेश कदम यांनी अधिकाºयांना दिले. बोंबाळेवाडी तलावातून रायगाव येथे केवळ ५०० मीटर उचलल्यास रायगाव, बोंबाळेवाडी व शाळगावची सुमारे एक हजार २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. पण, यासाठी अधिकाºयांकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. यावेळी कदम यांनी, खेराडे-विटा येथे टँकर सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, दुष्काळी परिस्थितीत पाटबंधारे विभागाने शेतकºयांना काढलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या, बंद झालेली ताकारी योजना तात्काळ सुरू करा, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.

ताकारी व टेंभू योजनेची पाणीपट्टी योग्य प्रमाणात आकारली जात नसून, ऊस पिकाव्यतिरिक्त अन्य पिकांच्या पाणीपट्टी कपातीचे कोणतेही नियोजन नाही. पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन नसल्याने कोणालाही व्यवस्थित पाणी मिळत नसल्याची तक्रार यावेळी शेतकºयांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून तडसर या गावाचा पाणीप्रश्न अनुत्तरीत आहे, महावितरणकडून नवीन वीज जोडणी जाणीवपूर्वक रोखली जात आहे, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील पथदिव्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, गावात वायरमन नाहीत, अशा अनेक तक्रारी यावेळी लोकांनी उपस्थित केल्या.

यावर विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना, अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाºयांनीसुद्धा यातील जास्तीत जास्त प्रश्न येत्या काही दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, विठ्ठल मुळीक, वैभव पवार, रायगावचे सरपंच समाधान घाडगे, बंडा पवार, सुरेश मुळीक, कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, नगरसेवक सागर सूर्यवंशी, अमरापूरचे सरपंच सुनील पाटील, मालन मोहिते, परशुराम माळी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘सोनहिरा’मार्फत ढाणेवाडीत चारा छावणीढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी सोनहिरा कारखान्यामार्फत चारा छावणी सुरू करणार आहे, अशी घोषणा आ. डॉ. कदम यांनी केली.

कडेगाव येथे गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत आ. डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, मालनताई मोहिते उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना