शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

चांदोली धरण शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:37 IST

चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला.

ठळक मुद्दे सांगली, कोल्हापूर जिल्'ाला दिलासा : धरण परिसरात तेरा दिवस अतिवृष्टी

वारणावती : अतिवृष्टी व सलग चार महिने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चांदोली धरण गुरुवारी सकाळी आठ वाजता शंभर टक्के भरल्याचे पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांगली व कोल्हापूर जिल्'ातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

सांगली जिल्'ातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील व सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्'ातील सरहद्दीवर चांदोली धरण आहे. ३६७.१७ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र असलेल्या चांदोली धरणाची ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. हे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. त्यामुळे वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर २९ आॅगस्टपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच चालल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू केला होता. यामुळे वारणा नदीच्या पुराने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली होती. पुन्हा पावसाने जोर कमी केल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग कमी केला.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक काही प्रमाणात सुरूच होती. पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा साठा शंभर टक्के करण्यात आला आहे. चांदोली धरणात सध्या ९४७.१८८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची पातळी ६२६.९० मीटर झाली आहे. जूनपासून आजपर्यंत ४६०५ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्राकडून १२४५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

 

टॅग्स :DamधरणSangliसांगली