शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

चांदोली धरण शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:37 IST

चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला.

ठळक मुद्दे सांगली, कोल्हापूर जिल्'ाला दिलासा : धरण परिसरात तेरा दिवस अतिवृष्टी

वारणावती : अतिवृष्टी व सलग चार महिने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चांदोली धरण गुरुवारी सकाळी आठ वाजता शंभर टक्के भरल्याचे पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांगली व कोल्हापूर जिल्'ातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

सांगली जिल्'ातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील व सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्'ातील सरहद्दीवर चांदोली धरण आहे. ३६७.१७ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र असलेल्या चांदोली धरणाची ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. हे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. त्यामुळे वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर २९ आॅगस्टपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच चालल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू केला होता. यामुळे वारणा नदीच्या पुराने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली होती. पुन्हा पावसाने जोर कमी केल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग कमी केला.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक काही प्रमाणात सुरूच होती. पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा साठा शंभर टक्के करण्यात आला आहे. चांदोली धरणात सध्या ९४७.१८८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची पातळी ६२६.९० मीटर झाली आहे. जूनपासून आजपर्यंत ४६०५ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्राकडून १२४५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

 

टॅग्स :DamधरणSangliसांगली