शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चांदोली परिसर आगीने होरपळतोय :उपाययोजनांची गरज; दुर्मिळ वनस्पती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:05 AM

शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक

ठळक मुद्दे वन विभागाचे दुर्लक्ष

गंगाराम पाटील ।वारणावती : शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक जीवजंतू आगीत भस्मसात होत आहेत. हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता काळे ठिक्कर पडले आहेत. चांदोली अभयारण्य प्रशासनाने व वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अशा विकृती फोफावत आहेत. त्याला आळा घालणे गरजेचे आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दºयातून आरळा येथून उदगिरीला जाणारा रस्ता आहे. देवीचे दर्शन घेऊन येताना व जाताना डोंगर-दºयातून गवताला आगी लावण्याचे काम काही विकृत माणसे करीत आहेत. एकदा आग लागली की आग आटोक्यात येत नाही. आगीमुळे अनेक जीवजंतू आगीत भस्मसात होत आहेत. पशु-पक्षी सैरावैरा धावायला लागतात. पण आग त्यांचा पाठलाग सोडत नाही. कित्येक जीव होरपळून जातात. शिवाय आगीमुळे चांदोली अभयारण्याशेजारील मणदूर, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी, जाधववाडी, खुंदलापूर या परिसरातील डोंगर-दºयातील हिरवाईने नटलेला निसर्ग काळा ठिक्कर पडला आहे. सरपटणारे जीव, दुर्मिळ वनौषधी नामशेष होत आहेत. त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

चांदोली अभयारण्य प्रशासनाला कोट्यवधी रूपयांचा निधी मिळतो; पण आगप्रतिबंधक उपाययोजनेवर काहीच निधी खर्च केला नसल्याने व ठोस उपाययोजना केल्या नसल्याने आगीवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. यासाठी कडक उपाययोजना करावी. आग लावल्यानंतर ती नियंत्रित होत नाही. आग लागू नये म्हणून दक्षता घ्यावी व आगी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी लोकांची मागणी आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता विशेष पथकाची स्थापना करण्याचा पर्यायही आहे. त्याचा प्रशासनाच्या पातळीवर विचार केला जावा. अगीच्या या घटनांमुळे वनांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.

आग आटोक्यात आणण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांनी ५ ब्लोअर यंत्रे दिली आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. एक यंत्र १० ते १२ लोकांचे काम करते. पण त्याचा फायदा अभयारण्याशेजारच्या डोंगर-दºयातून लागलेल्या आगी आटोक्यात आणण्यासाठी केला जात नाही.वृक्षारोपणावर भर : संवर्धनाचे काय?एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून झाडे लावत आहे. पण त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. अशा डोंगराला लागलेल्या आगीत झाडेझुडपे जळून खाक होत आहेत. अभयारण्य प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग यांनी एकत्रितपणे प्रबोधन करावे व आगीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्रातील वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रसंगी आग लावणाºयांवर कारवाई करण्याचीही भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी असे कृत्य करणारे वन विभागाच्या जाळ्यात सापडावेत म्हणून स्थानिक नागरिकांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. सामूहिक प्रयत्नातूनच आगीच्या घटना नियंत्रणात येऊ शकतील.

चांदोली धरण आणि अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यांमध्ये आग लागून वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग