शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

जलशक्ती अभियानात कवठेमहांकाळ तालुक्यातील कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 17:02 IST

केंद्र शासनामार्फत पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या संलग्नतेने राबविण्यात येत आहे. हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 व दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कवठेमहांकाळ तालुक्यात जलशक्ती अभियान कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी

सांगली : केंद्र शासनामार्फत पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या संलग्नतेने राबविण्यात येत आहे. हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 व दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातून कवठेमहांकाळ तालुक्याची निवड झाली असून या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.जलशक्ती अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये (1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 ) मध्ये चालू असलेल्या कामांची तपासणी करणेसाठी केंद्र शासनाकडील सह सचिव, उपसचिव, व तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पथक हे चालू असलेल्या कामांची दर 15 दिवसांनी 3 वेळा पहाणी करणार आहेत.

त्या अनुषंगाने व्दितीय तपासणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे उपसचिव राजू वैद्य व जलशक्ती अभियान मंत्रालय तांत्रिक अधिकारी हनमंतआप्पा हे दि.28/08/2019 ते 31/08/2019 पर्यंत दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये त्यांनी तालुकास्‍तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन सांगली जिल्ह्यातील आराखड्याबाबतची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना यंत्रणेला दिल्या. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.महिला बचतगट यांची बैठक घेवून यामध्ये सहभागी होण्‍याबाबत आवाहन केले. या अभियानाअंतर्गत चालू असलेल्या कामांची तपासणी कुकटोळी, अलकुड एम, हरोली, आगळगाव, रायवाडी, विठुरायाचीवाडी, खरसिंग, बोरगाव, मळणगाव, नागज या ठिकाणी शोषखड्डा, वृक्षलागवड, छतावर पडणारे पावसाच्या पाण्याचा संचय, पाझर तलाव, समतल चर इत्यादी कामांची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

तसेच अलकुड एम मध्‍ये कृषी विज्ञान केंद्र तर्फे आयोजित केलेल्‍या मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना जलशक्‍ती कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर योजनेमध्ये सांगली जिल्हा हा देशामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्याबाबत सर्व विभाग/ यंत्रणानी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या.या अभियानामध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, वृक्ष लागवड, सलग समतल चर, सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन शेततळी बांधणे, शेततळी दुरुस्ती, नाला, ओढ्यामधील गाळ काढणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, शोष खड्डे, विहीर पुनर्भरण, बोअर वेल पुनर्भरण, माती नाला बांध इत्यादी प्रकारची कामे घेण्यात येणार आहेत व सदर अभियानामध्ये तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, नगरपालिका, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जीएसडीए इत्यादी विभागांचा समावेश असून या यंत्रणामार्फत कामे चालू आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी