शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:58 IST

गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

संतोष भिसेसांगली : गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. यामुळे इस्लामपूरकरांच्या अपेक्षांना पुन्हा धुमारे फुटले आहेत. त्याचबरोबर बागायतदार शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळाही उठला आहे.  ‘गतिशक्ती’मधून  देशातील ५० हजारहून अधिक लोकसंख्येची ८० शहरे रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील इस्लामपूरसह ११ शहरांचा  समावेश आहे. यामुळे दळणवळणाच्या देशव्यापी जाळ्यामध्ये इस्लामपूरही येणार आहे. तथापि, भूसंपादनाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे चिंतेचे ढग दाटले आहेत. शंभर टक्के सिंचनाखालील शेतजमिनी लोहमार्गासाठी देण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही.

२०१४ मध्ये प्राथमिक सर्वेक्षण

  • इस्लामपूरच्या रेल्वेसाठी २०१४ मध्ये प्राथमिक सर्वेक्षण झाले होते. शेणोली किंवा भवानीनगरमधून लोहमार्गाला फाटा काढून इस्लामपूरपर्यंत आणण्याचे नियोजन होते.
  • दुसऱ्या योजनेनुसार ताकारीतून फाटा काढून इस्लामपूर, कामेरी, किणी, वडगाव व तेथून महामार्गाला समांतर बेळगावपर्यंत लोहमार्गाचा विचार होता. कऱ्हाड ते बेळगाव असा नवा १५० किलोमीटर लोहमार्ग प्रस्तावित होता.
  • सध्या कऱ्हाड-मिरज-बेळगाव हे अंतर १८२ किलोमीटर आहे. नव्या मार्गामुळे ते फक्त ३० किलोमीटरने कमी झाले असते.

पुन्हा हालचाली सुरूआता गतिशक्ती योजनेमधून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात प्राथमिक सर्वेक्षण होईल. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने  व्यावहारिकता तपासली जाईल. जमिनीची उपलब्धता, नदी-नाले, सध्याच्या मार्गावर होणारा अनुकूल-प्रतिकूल परिणाम याचाही विचार होईल. अंतिम निर्णय रेल्वे मंडळ आणि केंद्र शासन स्तरावर होईल.

प्रतिकिलोमीटर १३ कोटींचा खर्च

  • नव्या मार्गात पाच-सात नद्या असल्याने खर्चही प्रचंड आहे. रेल्वेच्या गणितानुसार प्रतिकिलोमीटर चार कोटींचा खर्च अपेक्षित असतो.
  • इस्लामपूरच्या नव्या मार्गाचा खर्च १२ ते १३ कोटींवर जातो, शिवाय भूसंपादनासाठीही कोट्यवधी खर्च होईल.
  • २०१४ मध्ये साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला, त्यामुळे इस्लामपूरची रेल्वे कागदावरच राहिली. 
टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेislampur-acइस्लामपूर