शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:58 IST

गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

संतोष भिसेसांगली : गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. यामुळे इस्लामपूरकरांच्या अपेक्षांना पुन्हा धुमारे फुटले आहेत. त्याचबरोबर बागायतदार शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळाही उठला आहे.  ‘गतिशक्ती’मधून  देशातील ५० हजारहून अधिक लोकसंख्येची ८० शहरे रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील इस्लामपूरसह ११ शहरांचा  समावेश आहे. यामुळे दळणवळणाच्या देशव्यापी जाळ्यामध्ये इस्लामपूरही येणार आहे. तथापि, भूसंपादनाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे चिंतेचे ढग दाटले आहेत. शंभर टक्के सिंचनाखालील शेतजमिनी लोहमार्गासाठी देण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही.

२०१४ मध्ये प्राथमिक सर्वेक्षण

  • इस्लामपूरच्या रेल्वेसाठी २०१४ मध्ये प्राथमिक सर्वेक्षण झाले होते. शेणोली किंवा भवानीनगरमधून लोहमार्गाला फाटा काढून इस्लामपूरपर्यंत आणण्याचे नियोजन होते.
  • दुसऱ्या योजनेनुसार ताकारीतून फाटा काढून इस्लामपूर, कामेरी, किणी, वडगाव व तेथून महामार्गाला समांतर बेळगावपर्यंत लोहमार्गाचा विचार होता. कऱ्हाड ते बेळगाव असा नवा १५० किलोमीटर लोहमार्ग प्रस्तावित होता.
  • सध्या कऱ्हाड-मिरज-बेळगाव हे अंतर १८२ किलोमीटर आहे. नव्या मार्गामुळे ते फक्त ३० किलोमीटरने कमी झाले असते.

पुन्हा हालचाली सुरूआता गतिशक्ती योजनेमधून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात प्राथमिक सर्वेक्षण होईल. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने  व्यावहारिकता तपासली जाईल. जमिनीची उपलब्धता, नदी-नाले, सध्याच्या मार्गावर होणारा अनुकूल-प्रतिकूल परिणाम याचाही विचार होईल. अंतिम निर्णय रेल्वे मंडळ आणि केंद्र शासन स्तरावर होईल.

प्रतिकिलोमीटर १३ कोटींचा खर्च

  • नव्या मार्गात पाच-सात नद्या असल्याने खर्चही प्रचंड आहे. रेल्वेच्या गणितानुसार प्रतिकिलोमीटर चार कोटींचा खर्च अपेक्षित असतो.
  • इस्लामपूरच्या नव्या मार्गाचा खर्च १२ ते १३ कोटींवर जातो, शिवाय भूसंपादनासाठीही कोट्यवधी खर्च होईल.
  • २०१४ मध्ये साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला, त्यामुळे इस्लामपूरची रेल्वे कागदावरच राहिली. 
टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेislampur-acइस्लामपूर