शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

वनीकरण विभागाने बांधलेली स्मशानभूमी ‘चोरीला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:58 IST

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : ‘कायद्याचं बोला...’ या चित्रपटात दाखविण्यात आलेला, विहीर चोरीला गेल्याचा किस्सा सर्वज्ञात आहे. जांभुळणी (ता. आटपाडी) येथेही प्रत्यक्षात अशीच अचंबित करणारी घटना घडली आहे.वनीकरण विभागाने या गावात एक स्मशानभूमी बांधली होती म्हणे. गावातील लोकांना थंड पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर आणि ग्रामस्थांना बसायला तीन सतरंज्या दिल्या ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : ‘कायद्याचं बोला...’ या चित्रपटात दाखविण्यात आलेला, विहीर चोरीला गेल्याचा किस्सा सर्वज्ञात आहे. जांभुळणी (ता. आटपाडी) येथेही प्रत्यक्षात अशीच अचंबित करणारी घटना घडली आहे.वनीकरण विभागाने या गावात एक स्मशानभूमी बांधली होती म्हणे. गावातील लोकांना थंड पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर आणि ग्रामस्थांना बसायला तीन सतरंज्या दिल्या होत्या. पण यापैकी एकही वस्तू अस्तित्वात नाही!आटपाडीतील स्वतंत्रपूर वसाहतीजवळ वनक्षेत्रपाल रोहयो कार्यालय आहे. मुळात गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर दूर डुबई कुरणात हे कार्यालय आहे. या कार्यालयात ‘साहेब दाखवा आणि एक हजार मिळवा!’ असे नागरिकांतून बक्षीस लावले जाते. एखाद्दुसरा कारकुन कार्यालयात हजर असतो. साहेब कुठे आहेत, म्हणून विचारले, तर उत्तर मिळते, ‘मिटिंगला!’ मिटिंग कुठे आहे म्हटल्यावर, ‘सांगलीला’ असे हमखास उत्तर मिळते. या विभागाची कायम कशी ‘मिटिंग’ असते, हे नागरिकांना न सुटलेले कोडे आहे.या विभागाकडे जांभुळणी येथे गट नंबर २६५ मध्ये १० हेक्टर, गट नंबर ३५६ मध्ये १६ हेक्टर, गट नंबर ५७७ मध्ये १६.५१ हेक्टर आणि गट नंबर ७४७ मध्ये ३५.६३ हेक्टर एवढी जमीन आहे. मात्र ग्रामस्थांची ग्रामवन समिती करून त्यांच्या सहकार्याने झाडे वाढावीत आणि निसर्गाचा समतोल राखला जावा, ही अपेक्षा या विभागातील भ्रष्ट अधिकाºयांनी फोल ठरविली आहे.या गावात योजना राबविण्यासाठी अधिकाºयांना पूरक गावकरी मिळावेत, यासाठी चक्क ग्रामपंचायतीच्या बोगस लेटरहेड आणि सही-शिक्के वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोगस वन समिती स्थापन करून वनीकरणाच्या नावावर भ्रष्टाचार सुरू आहे. वारंवार वन समिती बदलली जात आहे. या गावात अनुदानातून एकूण आठ कुटुंबांना गॅस कनेक्शन द्यायचे होते, पण एकाच घरातील तीन सख्ख्या बंधूंना गॅस कनेक्शन देण्यात आले. एक शासकीय नोकर आहे. त्याची पांढरी शिधापत्रिका असताना त्याला लाभ देण्याचा प्रताप या विभागाने केला आहे.या गावात सुमारे दीड लाख रुपये खर्चून २०११-१२ मध्ये वनीकरण विभागाने स्मशानभूमी बांधली. पण त्यानंतर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीनेही स्मशानभूमी बांधली. मग आधी वनीकरण विभागाने बांधलेली स्मशानभूमी गेली कुठे? याबाबत अशोक जुगदर यांनी माहिती अधिकारात या विभागाकडे लेखी विचारणा केली. त्यावर अधिकाºयांचे म्हणणे असे आहे की, आम्ही ग्रामपंचायतीला, आम्ही बांधलेली स्मशानभूमी का आणि कधी पाडली, याची माहिती विचारली. पण त्याचे उत्तर मिळू शकत नाही. शिवाय ग्रामस्थांनी कधीही मागणी केलेली नसताना आणि गावात कुणीही न पाहिलेल्या वस्तूंची केवळ खरेदी बिले दाखवून अधिकाºयांनी रक्कम हडप केली आहे. वॉटर कुलर आणि १० बाय १५ आकाराच्या तीन सतरंज्या २० मे २०१६ पासून गावात दिल्याचे केवळ कागदोपत्री दाखविले आहे. याबाबत विचारणा केली असता, माहिती सांगता येत नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे.आधी भ्रष्टाचार; मग ताबा!दि. १३ जून २०१६ रोजी धनादेशाद्वारे विटा येथील एका दुकानातून ५१,५५० रुपयांना वॉटर कुलर आणि सतरंज्या खरेदी केल्या. एवढ्या साहित्याची जांभुळणीत वाहतूक करण्यासाठी चक्क तीन हजार भाडे धनादेशाने देण्यात आले. विशेष म्हणजे या वस्तूंची ताबा पावती मात्र दि. २० मे २०१६ ची आहे. या अधिकाºयांनी खरेदीआधी वस्तूंचा ताबा दिल्याची माहिती दिली आहे!