शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सांगली : घोड्यांवरून पंचनाम्याची चौकशी होणार, सदाभाऊ खोत : औरंगाबाद येथील प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:56 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देबोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यात कपाशीचे मोठे नुकसानप्रकरणाची तातडीने कारणीमिमांसा, त्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पंचनाम्याचा अहवाल सादर होणार की पुन्हा पंचनामे केले जाणार हा चर्चेचा विषय

सांगली : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना संबंधित शेतमालकानेच घोड्यावरून येण्यास सांगितले होते. ते घोडेही शेतमालकाचेच होते, असे सांगण्यात येत आहे. तरीही अशाप्रकारची गरज अधिकाऱ्यांना का भासली, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. प्रकरणाची तातडीने कारणीमिमांसा होईल. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले होते. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक तैनात केले होते.

अंचलगाव येथे गणेश चोथे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृष सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार होऊन पंचनामा करतानाची छायाचित्रेही त्यांनी काढली होती.

नेमकी हीच छायाचित्रे त्यांच्या अडचणीची ठरली आहेत. घोड्यावरून पंचनामा करण्याच्या अजब पद्धतीबद्दल राजकीय टीकाही होऊ लागली आहे. राज्याच्या राजकीय पटलावर हा विषय आता चर्चेत आला असून कृषी विभागाचीही डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

सदाभाऊ खोत यांनी आता चौकशीचे आदेश दिल्याने याप्रकरणी आता अधिकारी काय खुलासा करणार आणि त्यांच्याबद्दल काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या पंचनाम्याचा अहवाल सादर होणार की पुन्हा पंचनामे केले जाणार हासुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत SangliसांगलीAurangabadऔरंगाबाद