शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली : घोड्यांवरून पंचनाम्याची चौकशी होणार, सदाभाऊ खोत : औरंगाबाद येथील प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:56 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देबोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यात कपाशीचे मोठे नुकसानप्रकरणाची तातडीने कारणीमिमांसा, त्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पंचनाम्याचा अहवाल सादर होणार की पुन्हा पंचनामे केले जाणार हा चर्चेचा विषय

सांगली : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना संबंधित शेतमालकानेच घोड्यावरून येण्यास सांगितले होते. ते घोडेही शेतमालकाचेच होते, असे सांगण्यात येत आहे. तरीही अशाप्रकारची गरज अधिकाऱ्यांना का भासली, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. प्रकरणाची तातडीने कारणीमिमांसा होईल. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले होते. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक तैनात केले होते.

अंचलगाव येथे गणेश चोथे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृष सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार होऊन पंचनामा करतानाची छायाचित्रेही त्यांनी काढली होती.

नेमकी हीच छायाचित्रे त्यांच्या अडचणीची ठरली आहेत. घोड्यावरून पंचनामा करण्याच्या अजब पद्धतीबद्दल राजकीय टीकाही होऊ लागली आहे. राज्याच्या राजकीय पटलावर हा विषय आता चर्चेत आला असून कृषी विभागाचीही डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

सदाभाऊ खोत यांनी आता चौकशीचे आदेश दिल्याने याप्रकरणी आता अधिकारी काय खुलासा करणार आणि त्यांच्याबद्दल काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या पंचनाम्याचा अहवाल सादर होणार की पुन्हा पंचनामे केले जाणार हासुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत SangliसांगलीAurangabadऔरंगाबाद