दिघंचीच्या लोकनियुक्त सरपंचाचे पद रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:17+5:302021-08-27T04:29:17+5:30
आटपाडी : तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना सरपंच पदावरून काढून टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे ...

दिघंचीच्या लोकनियुक्त सरपंचाचे पद रद्द करा
आटपाडी : तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना सरपंच पदावरून काढून टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.
दिघंचीच्या ग्रामपंचायत सदस्या आशाराणी समाधान नळ यांनी सरपंच मोरे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
चौदावा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपट्टी निधी, बाजार पावत्या यामध्ये ग्रामपंचायत कारभारामध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मिरजेचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने दि. १३ सप्टेंबर २० रोजी दिघंची ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या समितीने दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी अहवाल सादर केला. त्यानंतर सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेस विद्यमान सरपंच मोरे हे जबाबदार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. या सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९(१) नुसार कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे.