शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

जातनिहाय जनगणनेसाठी मोठा लढा उभारू : गोरे, संविधानिक न्याययात्रेचे सांगलीत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:28 PM

सांगली : विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्यात यावी. याप्रश्नी शासनाने दखल न घेतल्यास मोठा लढा उभारण्यात येईल,

ठळक मुद्दे जनगणना नसल्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांची गर्दी वाढली

सांगली : विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्यात यावी. याप्रश्नी शासनाने दखल न घेतल्यास मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय ओबीसी शोषित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे यांनी सोमवारी सांगलीत दिला.

संघटनेमार्फत देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी सुरू असलेल्या संविधानिक न्याय यात्रेचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या कालिका मंदिरात संघटनेचा मेळावा झाला. याठिकाणी व्यासपीठावर संघटनेचे गणेश सुतार, विलास काळे, दिलीप दीक्षित, माया गोरे, सुनीता काळे उपस्थित होते. गोरे म्हणाले की, ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. घटनेच्या ३४० व्या कलमानुसार ओबीसींचा सर्वांगीण विकास केवळ जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे होऊ शकला नाही. भटके विमुक्त अल्पसंख्यांकांना सुरक्षा तथा नागरी हक्क मिळालेच पाहिजेत. जनगणना नसल्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांची गर्दी वाढत आहे. अनेक नवनवे प्रश्न निर्माण होत आहेत.

खासगी क्षेत्रात ओबीसी, एस. सी. एन. टी यांना आरक्षण लागू करावे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.यावेळी प्रा. सुभाष दगडे, डॉ. संपतराव गायकवाड, दत्तात्रय घाटगे, अरुण खरमाटे, राजेंद्र माळी, चंद्रकांत मालवणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना सुतार, विनायक सुतार व सुरेश सुतार यांनी केले....अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलनशासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आम्ही त्यासाठीच यात्रा काढली आहे. तरीही शासनाने दखल घेतली नाही, तर देशातील सर्व ओबीसी समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही. हा समाज एकत्र आल्यानंतर मोठे आंदोलन उभे केले जाईल. जातनिहाय जनगणनेबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावे, सर्व मागास आयोगाची अंमलबजावणी करावी, कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करावी, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.