शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बोरगावची घटना दुर्लक्षित..!

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

दलितांचा मतांपुरता कळवळा : ‘समाजकल्याण’ करणार पाच लाखांची मदत

तासगाव : बोरगाव (ता. तासगाव) येथे दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांचा खून होऊन तीन दिवस झाले. या घटनेचा पुरोगामी संघटनांकडून निषेध व्यक्त झाला. मात्र आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधींकडून ही घटना दुर्लक्षितच राहिली आहे. लोकप्रतिनिधींना दलितांचा कळवळा केवळ मतांपुरताच असल्याचे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे. शिवसेना आमदार आणि भाजपचे खासदार या गावाशी संबंधित असूनही त्यांच्याकडून याप्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही. सवर्ण समाजातील तरुणांनी केलेल्या मारहाणीत बोरगाव येथील दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांचा मृत्यू झाला. ‘लोकमत’ने या घटनेचे ‘आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग’ केल्यानंतर समाजातील सर्व स्तरांतून या घटनेबाबत संताप आणि निषेध व्यक्त झाला. अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबिंयांची भेट घेऊन सांत्वन केले. मात्र बोरगावशी संबंधित असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी मात्र या घटनेची साधी दखलही घेतली नाही. लोकप्रतिनिधी, राजकारण्यांकडून दलितांवर अन्याय, अत्याचार होत असताना दखल घेतली जात नाही. मात्र निवडणुका आल्या की केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी दलितांबाबत पोकळ कळवळा दाखवला जातो, अशी संतप्त प्रतिक्रिया पुरोगामी संघटनांतून व्यक्त झाली. वामन न्यायनिर्गुणे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर विशेष जिल्हा समाजकल्याण विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, शासकीय निमयानुसार सर्व मदत तात्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत करण्यात येणार असून, दोन दिवसांत शासन आदेशानुसार ७५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यानंतर उर्वरित २५ टक्केमदत देण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे यांनी दिली. तालुकास्तरावर समितीचा निर्णय केव्हा? अनुसूचित जाती-जमातीतील लोकांवरील अन्याय निवारणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. अशाच पध्दतीची तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील एक समिती तालुकास्तरावर स्थापन करण्याबाबतची शिफारस अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष थुल यांनी शासनाकडे केली आहे. मात्र त्यांची शिफारस अद्यापही शासन दरबारी धूळ खात पडून आहे. अशी समिती तालुकास्तरावर असती, तर न्यायनिर्गुणेंना जीव गमवावा लागला असता का? असा प्रश्न उपस्थित होत असून, तालुकास्तरावरील समिती तात्काळ व्हावी, अशी मागणी होत आहे.