शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बोरगावची घटना दुर्लक्षित..!

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

दलितांचा मतांपुरता कळवळा : ‘समाजकल्याण’ करणार पाच लाखांची मदत

तासगाव : बोरगाव (ता. तासगाव) येथे दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांचा खून होऊन तीन दिवस झाले. या घटनेचा पुरोगामी संघटनांकडून निषेध व्यक्त झाला. मात्र आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधींकडून ही घटना दुर्लक्षितच राहिली आहे. लोकप्रतिनिधींना दलितांचा कळवळा केवळ मतांपुरताच असल्याचे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे. शिवसेना आमदार आणि भाजपचे खासदार या गावाशी संबंधित असूनही त्यांच्याकडून याप्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही. सवर्ण समाजातील तरुणांनी केलेल्या मारहाणीत बोरगाव येथील दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांचा मृत्यू झाला. ‘लोकमत’ने या घटनेचे ‘आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग’ केल्यानंतर समाजातील सर्व स्तरांतून या घटनेबाबत संताप आणि निषेध व्यक्त झाला. अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबिंयांची भेट घेऊन सांत्वन केले. मात्र बोरगावशी संबंधित असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी मात्र या घटनेची साधी दखलही घेतली नाही. लोकप्रतिनिधी, राजकारण्यांकडून दलितांवर अन्याय, अत्याचार होत असताना दखल घेतली जात नाही. मात्र निवडणुका आल्या की केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी दलितांबाबत पोकळ कळवळा दाखवला जातो, अशी संतप्त प्रतिक्रिया पुरोगामी संघटनांतून व्यक्त झाली. वामन न्यायनिर्गुणे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर विशेष जिल्हा समाजकल्याण विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, शासकीय निमयानुसार सर्व मदत तात्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत करण्यात येणार असून, दोन दिवसांत शासन आदेशानुसार ७५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यानंतर उर्वरित २५ टक्केमदत देण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे यांनी दिली. तालुकास्तरावर समितीचा निर्णय केव्हा? अनुसूचित जाती-जमातीतील लोकांवरील अन्याय निवारणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. अशाच पध्दतीची तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील एक समिती तालुकास्तरावर स्थापन करण्याबाबतची शिफारस अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष थुल यांनी शासनाकडे केली आहे. मात्र त्यांची शिफारस अद्यापही शासन दरबारी धूळ खात पडून आहे. अशी समिती तालुकास्तरावर असती, तर न्यायनिर्गुणेंना जीव गमवावा लागला असता का? असा प्रश्न उपस्थित होत असून, तालुकास्तरावरील समिती तात्काळ व्हावी, अशी मागणी होत आहे.