वाटेगावच्या रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:06+5:302021-02-05T07:28:06+5:30
वाटेगाव : रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे उपयुक्त पडतात, असे प्रतिपादन प. पू. १०८ ...

वाटेगावच्या रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान
वाटेगाव : रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे उपयुक्त पडतात, असे प्रतिपादन प. पू. १०८ स्वभावसागर महाराज यांनी केले.
श्री धर्मगिरी तीर्थक्षेत्र (ता. शिराळा) येथे कविरत्न धर्मसागर मुनी महाराज यांच्या ४९ व्या समाधी दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन धर्मगिरी क्षेत्राचे उद्धारक, धर्मसागर व स्वभावसागर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
बांबवडेच्या सरपंच कोमल पाटील, विश्वासचे संचालक विश्वास पाटील, राजीव बर्डे, सुकुमार पाटील,माणिक शेटे, चंदू शेटे, हणमंत पाटील, अनुप करांडे, पियुष करांडे उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. आचार्य श्री तुलशी ब्लड बँक,जयसिंगपूर यांनी रक्तसंकलन केले.
यावेळी शीतल शेटे, विजय शेटे अजित शेटे, सुभाष चौगुले, उज्ज्वला चौगुले (किणी) यांनी आहार दान केले यावेळी राजश्री शेटे (कराड) यांनी मार्गदर्शन केले. दुपारी शायरी व पोवाडा असे कार्यक्रम संपन्न झाले. निवृत्त न्यायाधीश कल्पना होरे, प्रकाश पाटील, डॉ. महावीर हांजे, कुमार भोकरे, धनपाल खोत, राजकुमार पाचोरे उपस्थिती होते.
फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम-वाटेगाव न्यूज
श्री धर्मगिरी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच कोमल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विश्वास पाटील, सुकुमार पाटील, अनुप करांडे उपस्थित होते.