शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Sangli: नियतीने डोळे हिरावले, पण हार नाही मानली; अस्वलेवाडीतील प्रज्ञा बारावीच्या परीक्षेत शाळेत पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 18:23 IST

दृष्टी परत मिळविण्यासाठी पालकांची पराकाष्ठा

बाबासाहेब परीटबिळाशी : पाचवीपर्यंत हसण्या-बागडण्याचं.. फुलपाखरू होऊन स्वच्छंदी फिरण्याचे वय आणि याच वयात अस्वलेवाडी (ता. शिराळा) येथील प्रज्ञा सुरेश जाधव या मुलीचे डोळेच गेले. डोळ्यांसमोर अंधार आणि आयुष्यातही अंधार पसरला.. पण या अंधाराच्या पलीकडेही आपल्यासाठी पहाट असते याची जाणीव झालेल्या प्रज्ञाने बारावीच्या परीक्षेत ७७.१७ टक्के गुणांसह काेकरूड (ता. शिराळा) येथील कन्या शाळेत पहिला क्रमांक पटकावला.लहान वयातच डाेळे गेले तरीही धडपडुन शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञाला दहावीला ६० टक्के गुण मिळाले. ते खूपच कमी आहेत अशी टोचणी तिला लागली. तिने ठरवले की आपण खूप मेहनत करायची. अभ्यासासाठी प्रज्ञा पहाटे चारला उठायची. पुस्तकांची वानवा.. ब्रेललिपी येत नव्हती. यादरम्यान मंगरूळ येथील दिव्यांग अभय कुंभार यांनी तिला ऑडिओ बुक्सबद्दल माहिती दिली.बघता-बघता विविध विषयांवरील बुक्स उपलब्ध झाली. पहाटेपासून शांतपणे ऐकत राहायचे... युट्युबवरील अनेक व्हिडिओ ऐकायचे.. आई-वडील भावाच्या मदतीने हे सगळं करायचं. पण हार मानायची नाही.. मोबाईल नव्हता म्हणून मामाने मोबाईल घेऊन दिला.. मोबाईलचा योग्य वापर करून प्रज्ञाने प्रचंड मेहनत घेतली. बारावीच्या परीक्षेत ती कोकरूडच्या कन्या शाळेत पहिली आली आहे.खरंतर हे तिचे यश सामान्य नाहीच. सर्व सुखसोयी उपलब्ध असताना शरीर धडधाकट असतानाही अनेक मुले जिद्दीअभावी मागे पडतात. पण डोळे नसतानाही प्रज्ञाने मेहनतीने संपादन केलेले यश निश्चितच प्रेरक आहे.

दृष्टी परत मिळविण्यासाठी पालकांची पराकाष्ठासहावीत शिकत असताना प्रज्ञाची दृष्टी गेली. तिचे डोळे परत यावेत म्हणून हमाली करणारे वडील सुरेश जाधव आणि घरकाम करणारी आई तसेच तिच्या मामाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अगदी हैदराबादपर्यंत तिला नेण्यात आले पण यश आले नाही.

टॅग्स :SangliसांगलीHSC Exam Resultबारावी निकाल