शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

कवठेमहांकाळ कडकडीत बंद

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

शिवसेना आक्रमक : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; भाजपवर टीका

कवठेमहांकाळ : म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बुधवारी कवठेमहांकाळ शहर बंद केले. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसैनिकांनी निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले. सध्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत; परंतु शासनाला जाग येत नाही. शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहोत. या शासनाला धडा शिकवू, असे निवेदनात म्हटले आहे. वीज बिल भरल्यानंतर पाणी सोडू, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. परंत, या नेत्यांनी शेतीला पाणीच दिले नाही. तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, भाजप वीज बिल भरण्याची सक्ती करीत आहे. ही शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका असून पाणी सोडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. आठ दिवसांत पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी संजय चव्हाण, प्रकाश चव्हाण, महेश जाधव, अनिल बासर, गुंडा पोतदार, अनिल पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)