शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

जातीपातीच्या राजकारणाचा भाजपकडून वापर , विश्वजित कदम यांची सांगलीत टीका : काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:35 IST

सांगली : जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून भाजप सरकारने राज्यातील वातावरण दूषित केले आहे. देशातही अशीच परिस्थिती असल्याने या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे

सांगली : जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून भाजप सरकारने राज्यातील वातावरण दूषित केले आहे. देशातही अशीच परिस्थिती असल्याने या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी काँग्रेसच्या आंदोलनावेळी केली.

सांगलीत स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, निरीक्षक प्रकाश सातपुते, आनंदराव मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, माजी महापौर कांचन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, आतापर्यंत साठ वर्षात कधीही समाजा-समाजात फूट पडलेली नव्हती. परंतु हे सरकार जाती-पातीचे विष पेरत असल्याने वातावरण बदलत आहे. लोकांमधूनच आता या गोष्टी थांबविण्याचे आवाहन केले जात आहे. दलितांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आलेला कायदाही बदलण्याचा घाट घातला. त्यांच्यावर अत्यावर करुन त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो. मुस्लिम लोकांवर दबाव आणतानाच हिंदूंमध्येही दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू झाले आहेत. या सर्व गोष्टी भारताच्या सार्वभौमत्वाला घातक ठरणार आहेत. त्यामुळे त्या रोखण्यासाठी जनतेच्यावतीने राहुल गांधी संघर्ष करीत आहेत.

प्रतीक पाटील म्हणाले की, विरोधकांचे अधिकारही काढून घेण्याचे काम केले जात असल्याने संविधानाची चेष्टा केली जात आहे. ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत होती, तिथे जातीयवादाचा संघर्ष कधीच झाला नाही. मात्र ज्याठिकाणी भाजप सरकारची सत्ता आहे, तिथे जातीयवाद तीव्रतेने दिसून येत आहे.सत्यजित देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भा जपचे अध्यक्ष अमित शहा या दोन नेत्यांचे सरकार केंद्रात आहे. दोघांकडून वेगवेगळी राज्ये फोडण्याचे काम केले जात आहे. जातीय सलोखा टिकविण्यासाठी काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यात काँग्रेस सशक्त करण्यासाठी आम्ही सर्व नेते, कार्यकर्ते एकत्र बसून रणनीती आखणार आहोत.

आंदोलनास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक अण्णासाहेब कोरे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, ए. डी. पाटील, इंद्रजित साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील, जितेश कदम उपस्थित होते.जनता आमच्याच पाठीशी!पृथ्वीराज पाटील म्हणाले की, काँग्रेसला जनतेचे बळ मिळत असल्याने आगामी काळात भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावेच लागेल. सामाजिक सलोखा बिघडवून अशांतता पसरविण्याचा उद्योग सर्वत्र सुरू झाला आहे. कॉँग्रेसमार्फत त्यांचा हा डाव उधळून लावला जाईल. 

तासगावात सत्तेचा गैरवापरतासगावात पोलिसांना मारहाण करण्याची घटना निंदनीय असल्याची टीकाही कदम व प्रतीक पाटील यांनी केली. पोलीस समाजाचे रक्षक आहेत. त्यांच्या कामात राजकीय दबावाने अडथळा आणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारण