शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जातीपातीच्या राजकारणाचा भाजपकडून वापर , विश्वजित कदम यांची सांगलीत टीका : काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:35 IST

सांगली : जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून भाजप सरकारने राज्यातील वातावरण दूषित केले आहे. देशातही अशीच परिस्थिती असल्याने या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे

सांगली : जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून भाजप सरकारने राज्यातील वातावरण दूषित केले आहे. देशातही अशीच परिस्थिती असल्याने या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी काँग्रेसच्या आंदोलनावेळी केली.

सांगलीत स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, निरीक्षक प्रकाश सातपुते, आनंदराव मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, माजी महापौर कांचन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, आतापर्यंत साठ वर्षात कधीही समाजा-समाजात फूट पडलेली नव्हती. परंतु हे सरकार जाती-पातीचे विष पेरत असल्याने वातावरण बदलत आहे. लोकांमधूनच आता या गोष्टी थांबविण्याचे आवाहन केले जात आहे. दलितांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आलेला कायदाही बदलण्याचा घाट घातला. त्यांच्यावर अत्यावर करुन त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो. मुस्लिम लोकांवर दबाव आणतानाच हिंदूंमध्येही दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू झाले आहेत. या सर्व गोष्टी भारताच्या सार्वभौमत्वाला घातक ठरणार आहेत. त्यामुळे त्या रोखण्यासाठी जनतेच्यावतीने राहुल गांधी संघर्ष करीत आहेत.

प्रतीक पाटील म्हणाले की, विरोधकांचे अधिकारही काढून घेण्याचे काम केले जात असल्याने संविधानाची चेष्टा केली जात आहे. ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत होती, तिथे जातीयवादाचा संघर्ष कधीच झाला नाही. मात्र ज्याठिकाणी भाजप सरकारची सत्ता आहे, तिथे जातीयवाद तीव्रतेने दिसून येत आहे.सत्यजित देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भा जपचे अध्यक्ष अमित शहा या दोन नेत्यांचे सरकार केंद्रात आहे. दोघांकडून वेगवेगळी राज्ये फोडण्याचे काम केले जात आहे. जातीय सलोखा टिकविण्यासाठी काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यात काँग्रेस सशक्त करण्यासाठी आम्ही सर्व नेते, कार्यकर्ते एकत्र बसून रणनीती आखणार आहोत.

आंदोलनास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक अण्णासाहेब कोरे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, ए. डी. पाटील, इंद्रजित साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील, जितेश कदम उपस्थित होते.जनता आमच्याच पाठीशी!पृथ्वीराज पाटील म्हणाले की, काँग्रेसला जनतेचे बळ मिळत असल्याने आगामी काळात भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावेच लागेल. सामाजिक सलोखा बिघडवून अशांतता पसरविण्याचा उद्योग सर्वत्र सुरू झाला आहे. कॉँग्रेसमार्फत त्यांचा हा डाव उधळून लावला जाईल. 

तासगावात सत्तेचा गैरवापरतासगावात पोलिसांना मारहाण करण्याची घटना निंदनीय असल्याची टीकाही कदम व प्रतीक पाटील यांनी केली. पोलीस समाजाचे रक्षक आहेत. त्यांच्या कामात राजकीय दबावाने अडथळा आणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारण