शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या ‘जयंत नीती’ला भाजपचा खोडा--सांगली, मिरज, कुपवाड महापालिका --निवडणूक विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:31 IST

सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’

श्रीनिवास नागेसत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केलेल्या भाजपने महापालिकेत आघाडीला चारीमुंड्या चीत केले. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेनंतर काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्व असलेले अखेरचे सत्ताकेंद्रही भाजपने हिसकावून घेतले.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वर्षभरापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले होते. मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद भाजपने हेरली होती. त्यातून त्यांनी निवडणुकीआधी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र शेवटच्या महिन्यात त्यात सातत्य ठेवण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याचे दिसले. मग हिकमती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. आधी त्यांनी ठाण मांडून, बैठका घेऊन, बुथनिहाय तयारीचा आढावा घेऊन पक्की बांधणी केली होतीच. काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षांतून घाऊक आवक करून त्यांना उमेदवारी द्यायचा त्यांचा बेत मिरजेत काहीसा यशस्वी झाला, पण सांगली-कुपवाडमध्ये तडीस गेला नाही. तथापि शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देताना सर्वेक्षण करून इच्छुकांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची यंत्रणा वापरली.त्यात त्यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना काहीसा ‘फ्री हॅन्ड’ दिला. सुभाष देशमुखांना केवळ पालकमंत्री म्हणून सभा-मेळाव्यांतून शाल-श्रीफळापुरता मान दिला, तर खासदार संजयकाका पाटील यांना मात्र काही अंतरावरच ठेवले होते! याचदरम्यान भाजपने कोणत्या ना कोणत्या कारणातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खुबीने कार्यक्रमांची आखणी केली. अगदी ‘भेटवस्तू’ देण्याची लोणकढी थापही ठोकून दिली!उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादी तुलनेने भाजपपेक्षा बाहुबली वाटत होती. कारण आघाडीत मुरब्बी खेळाडू होते. जयंत पाटील जात्याच हुशार. त्यांनी आघाडीचा तह करताना काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. जेथे भाजप बलवान आहे वा जेथे आपला टिकाव लागणार नाही, तेथे काँग्रेसला उमेदवारी घ्यायला भाग पाडले! ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे’ अशी गत काँग्रेस नेत्यांची झाली.मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या पश्चात काँग्रेस पहिल्यांदाच सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी गेली खरी, पण गटबाजी काही संपली नाही. आ. विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील एकत्र होते, पण विशाल पाटील यांच्याशी त्यांचे जुळले नाही. एकमुखी नेतृत्व व तगडी रसद नसल्याने काँग्रेसच्या चार-पाच जागा हातच्या गेल्या. दुसरीकडे कूटनीतीत मुरब्बी मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या खेळ्या त्यांच्याच अंगलट आल्या.काँग्रेसपेक्षा वरचढ होण्यासाठी त्यांनी ‘गेम’ आखली होती, पण त्यांच्या काही शिलेदारांनी आपापली ‘सीट’ काढत ‘क्रॉस व्होटींग’ करवून घेतल्याने राष्टÑवादीच्या पाच-सहा जागा गेल्या! शिवाय प्रभाग मोठे असल्यानेही ‘क्रॉस व्होटींग’ झाले. परिणामी आघाडीला हमखास मिळणारे चार प्रभाग गमवावे लागले. आघाडीत समन्वय तर बिलकूल नव्हता. त्यातच भाजप प्रचाराचा धुरळा उडवून देत असताना काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते १५ दिवस सांगलीबाहेर होते! मतदान १ आॅगस्टला, तर आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला २२ जुलैला!‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचविलेसत्ताधाºयांच्या विरोधातील नाराजी स्वत:च्या मतांमध्ये परिवर्तीत करण्यात भाजपची टीम यशस्वी ठरली, तर महापालिका क्षेत्रातील ‘अंडरकरंट’ काँग्रेस-राष्टÑवादीला समजलाच नाही. आघाडीतील बिघडलेला ताळमेळ दिसताच भाजपने मंत्र्यांसह नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीच ‘कसर’ सोडली नाही आणि बघताबघता ‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचवले. तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण