शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या ‘जयंत नीती’ला भाजपचा खोडा--सांगली, मिरज, कुपवाड महापालिका --निवडणूक विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:31 IST

सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’

श्रीनिवास नागेसत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केलेल्या भाजपने महापालिकेत आघाडीला चारीमुंड्या चीत केले. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेनंतर काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्व असलेले अखेरचे सत्ताकेंद्रही भाजपने हिसकावून घेतले.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वर्षभरापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले होते. मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद भाजपने हेरली होती. त्यातून त्यांनी निवडणुकीआधी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र शेवटच्या महिन्यात त्यात सातत्य ठेवण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याचे दिसले. मग हिकमती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. आधी त्यांनी ठाण मांडून, बैठका घेऊन, बुथनिहाय तयारीचा आढावा घेऊन पक्की बांधणी केली होतीच. काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षांतून घाऊक आवक करून त्यांना उमेदवारी द्यायचा त्यांचा बेत मिरजेत काहीसा यशस्वी झाला, पण सांगली-कुपवाडमध्ये तडीस गेला नाही. तथापि शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देताना सर्वेक्षण करून इच्छुकांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची यंत्रणा वापरली.त्यात त्यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना काहीसा ‘फ्री हॅन्ड’ दिला. सुभाष देशमुखांना केवळ पालकमंत्री म्हणून सभा-मेळाव्यांतून शाल-श्रीफळापुरता मान दिला, तर खासदार संजयकाका पाटील यांना मात्र काही अंतरावरच ठेवले होते! याचदरम्यान भाजपने कोणत्या ना कोणत्या कारणातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खुबीने कार्यक्रमांची आखणी केली. अगदी ‘भेटवस्तू’ देण्याची लोणकढी थापही ठोकून दिली!उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादी तुलनेने भाजपपेक्षा बाहुबली वाटत होती. कारण आघाडीत मुरब्बी खेळाडू होते. जयंत पाटील जात्याच हुशार. त्यांनी आघाडीचा तह करताना काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. जेथे भाजप बलवान आहे वा जेथे आपला टिकाव लागणार नाही, तेथे काँग्रेसला उमेदवारी घ्यायला भाग पाडले! ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे’ अशी गत काँग्रेस नेत्यांची झाली.मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या पश्चात काँग्रेस पहिल्यांदाच सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी गेली खरी, पण गटबाजी काही संपली नाही. आ. विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील एकत्र होते, पण विशाल पाटील यांच्याशी त्यांचे जुळले नाही. एकमुखी नेतृत्व व तगडी रसद नसल्याने काँग्रेसच्या चार-पाच जागा हातच्या गेल्या. दुसरीकडे कूटनीतीत मुरब्बी मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या खेळ्या त्यांच्याच अंगलट आल्या.काँग्रेसपेक्षा वरचढ होण्यासाठी त्यांनी ‘गेम’ आखली होती, पण त्यांच्या काही शिलेदारांनी आपापली ‘सीट’ काढत ‘क्रॉस व्होटींग’ करवून घेतल्याने राष्टÑवादीच्या पाच-सहा जागा गेल्या! शिवाय प्रभाग मोठे असल्यानेही ‘क्रॉस व्होटींग’ झाले. परिणामी आघाडीला हमखास मिळणारे चार प्रभाग गमवावे लागले. आघाडीत समन्वय तर बिलकूल नव्हता. त्यातच भाजप प्रचाराचा धुरळा उडवून देत असताना काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते १५ दिवस सांगलीबाहेर होते! मतदान १ आॅगस्टला, तर आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला २२ जुलैला!‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचविलेसत्ताधाºयांच्या विरोधातील नाराजी स्वत:च्या मतांमध्ये परिवर्तीत करण्यात भाजपची टीम यशस्वी ठरली, तर महापालिका क्षेत्रातील ‘अंडरकरंट’ काँग्रेस-राष्टÑवादीला समजलाच नाही. आघाडीतील बिघडलेला ताळमेळ दिसताच भाजपने मंत्र्यांसह नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीच ‘कसर’ सोडली नाही आणि बघताबघता ‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचवले. तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण