शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आघाडीच्या ‘जयंत नीती’ला भाजपचा खोडा--सांगली, मिरज, कुपवाड महापालिका --निवडणूक विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:31 IST

सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’

श्रीनिवास नागेसत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केलेल्या भाजपने महापालिकेत आघाडीला चारीमुंड्या चीत केले. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेनंतर काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्व असलेले अखेरचे सत्ताकेंद्रही भाजपने हिसकावून घेतले.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वर्षभरापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले होते. मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद भाजपने हेरली होती. त्यातून त्यांनी निवडणुकीआधी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र शेवटच्या महिन्यात त्यात सातत्य ठेवण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याचे दिसले. मग हिकमती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. आधी त्यांनी ठाण मांडून, बैठका घेऊन, बुथनिहाय तयारीचा आढावा घेऊन पक्की बांधणी केली होतीच. काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षांतून घाऊक आवक करून त्यांना उमेदवारी द्यायचा त्यांचा बेत मिरजेत काहीसा यशस्वी झाला, पण सांगली-कुपवाडमध्ये तडीस गेला नाही. तथापि शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देताना सर्वेक्षण करून इच्छुकांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची यंत्रणा वापरली.त्यात त्यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना काहीसा ‘फ्री हॅन्ड’ दिला. सुभाष देशमुखांना केवळ पालकमंत्री म्हणून सभा-मेळाव्यांतून शाल-श्रीफळापुरता मान दिला, तर खासदार संजयकाका पाटील यांना मात्र काही अंतरावरच ठेवले होते! याचदरम्यान भाजपने कोणत्या ना कोणत्या कारणातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खुबीने कार्यक्रमांची आखणी केली. अगदी ‘भेटवस्तू’ देण्याची लोणकढी थापही ठोकून दिली!उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादी तुलनेने भाजपपेक्षा बाहुबली वाटत होती. कारण आघाडीत मुरब्बी खेळाडू होते. जयंत पाटील जात्याच हुशार. त्यांनी आघाडीचा तह करताना काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. जेथे भाजप बलवान आहे वा जेथे आपला टिकाव लागणार नाही, तेथे काँग्रेसला उमेदवारी घ्यायला भाग पाडले! ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे’ अशी गत काँग्रेस नेत्यांची झाली.मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या पश्चात काँग्रेस पहिल्यांदाच सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी गेली खरी, पण गटबाजी काही संपली नाही. आ. विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील एकत्र होते, पण विशाल पाटील यांच्याशी त्यांचे जुळले नाही. एकमुखी नेतृत्व व तगडी रसद नसल्याने काँग्रेसच्या चार-पाच जागा हातच्या गेल्या. दुसरीकडे कूटनीतीत मुरब्बी मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या खेळ्या त्यांच्याच अंगलट आल्या.काँग्रेसपेक्षा वरचढ होण्यासाठी त्यांनी ‘गेम’ आखली होती, पण त्यांच्या काही शिलेदारांनी आपापली ‘सीट’ काढत ‘क्रॉस व्होटींग’ करवून घेतल्याने राष्टÑवादीच्या पाच-सहा जागा गेल्या! शिवाय प्रभाग मोठे असल्यानेही ‘क्रॉस व्होटींग’ झाले. परिणामी आघाडीला हमखास मिळणारे चार प्रभाग गमवावे लागले. आघाडीत समन्वय तर बिलकूल नव्हता. त्यातच भाजप प्रचाराचा धुरळा उडवून देत असताना काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते १५ दिवस सांगलीबाहेर होते! मतदान १ आॅगस्टला, तर आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला २२ जुलैला!‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचविलेसत्ताधाºयांच्या विरोधातील नाराजी स्वत:च्या मतांमध्ये परिवर्तीत करण्यात भाजपची टीम यशस्वी ठरली, तर महापालिका क्षेत्रातील ‘अंडरकरंट’ काँग्रेस-राष्टÑवादीला समजलाच नाही. आघाडीतील बिघडलेला ताळमेळ दिसताच भाजपने मंत्र्यांसह नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीच ‘कसर’ सोडली नाही आणि बघताबघता ‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचवले. तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण