शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

आघाडीच्या ‘जयंत नीती’ला भाजपचा खोडा--सांगली, मिरज, कुपवाड महापालिका --निवडणूक विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:31 IST

सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’

श्रीनिवास नागेसत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केलेल्या भाजपने महापालिकेत आघाडीला चारीमुंड्या चीत केले. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेनंतर काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्व असलेले अखेरचे सत्ताकेंद्रही भाजपने हिसकावून घेतले.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वर्षभरापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले होते. मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद भाजपने हेरली होती. त्यातून त्यांनी निवडणुकीआधी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र शेवटच्या महिन्यात त्यात सातत्य ठेवण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याचे दिसले. मग हिकमती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. आधी त्यांनी ठाण मांडून, बैठका घेऊन, बुथनिहाय तयारीचा आढावा घेऊन पक्की बांधणी केली होतीच. काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षांतून घाऊक आवक करून त्यांना उमेदवारी द्यायचा त्यांचा बेत मिरजेत काहीसा यशस्वी झाला, पण सांगली-कुपवाडमध्ये तडीस गेला नाही. तथापि शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देताना सर्वेक्षण करून इच्छुकांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची यंत्रणा वापरली.त्यात त्यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना काहीसा ‘फ्री हॅन्ड’ दिला. सुभाष देशमुखांना केवळ पालकमंत्री म्हणून सभा-मेळाव्यांतून शाल-श्रीफळापुरता मान दिला, तर खासदार संजयकाका पाटील यांना मात्र काही अंतरावरच ठेवले होते! याचदरम्यान भाजपने कोणत्या ना कोणत्या कारणातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खुबीने कार्यक्रमांची आखणी केली. अगदी ‘भेटवस्तू’ देण्याची लोणकढी थापही ठोकून दिली!उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादी तुलनेने भाजपपेक्षा बाहुबली वाटत होती. कारण आघाडीत मुरब्बी खेळाडू होते. जयंत पाटील जात्याच हुशार. त्यांनी आघाडीचा तह करताना काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. जेथे भाजप बलवान आहे वा जेथे आपला टिकाव लागणार नाही, तेथे काँग्रेसला उमेदवारी घ्यायला भाग पाडले! ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे’ अशी गत काँग्रेस नेत्यांची झाली.मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या पश्चात काँग्रेस पहिल्यांदाच सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी गेली खरी, पण गटबाजी काही संपली नाही. आ. विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील एकत्र होते, पण विशाल पाटील यांच्याशी त्यांचे जुळले नाही. एकमुखी नेतृत्व व तगडी रसद नसल्याने काँग्रेसच्या चार-पाच जागा हातच्या गेल्या. दुसरीकडे कूटनीतीत मुरब्बी मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या खेळ्या त्यांच्याच अंगलट आल्या.काँग्रेसपेक्षा वरचढ होण्यासाठी त्यांनी ‘गेम’ आखली होती, पण त्यांच्या काही शिलेदारांनी आपापली ‘सीट’ काढत ‘क्रॉस व्होटींग’ करवून घेतल्याने राष्टÑवादीच्या पाच-सहा जागा गेल्या! शिवाय प्रभाग मोठे असल्यानेही ‘क्रॉस व्होटींग’ झाले. परिणामी आघाडीला हमखास मिळणारे चार प्रभाग गमवावे लागले. आघाडीत समन्वय तर बिलकूल नव्हता. त्यातच भाजप प्रचाराचा धुरळा उडवून देत असताना काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते १५ दिवस सांगलीबाहेर होते! मतदान १ आॅगस्टला, तर आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला २२ जुलैला!‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचविलेसत्ताधाºयांच्या विरोधातील नाराजी स्वत:च्या मतांमध्ये परिवर्तीत करण्यात भाजपची टीम यशस्वी ठरली, तर महापालिका क्षेत्रातील ‘अंडरकरंट’ काँग्रेस-राष्टÑवादीला समजलाच नाही. आघाडीतील बिघडलेला ताळमेळ दिसताच भाजपने मंत्र्यांसह नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीच ‘कसर’ सोडली नाही आणि बघताबघता ‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचवले. तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण