शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:34 IST

शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.

ठळक मुद्देभाजपवरील टीका सेनाप्रमुख विसरले का?

इस्लामपूर : शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.आ. पाटील हे अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय प्रश्नावर व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी हे ट्विट करीत शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

आ. पाटील म्हणाले, शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै. सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकार व भाजपची लक्तरे काढली आहेत. शिवसेनेने मोदी सरकारची ‘जुलमी ब्रिटिश राजवटी’शी तुलना करून या सरकारला झोपाळू ‘कुंभकर्ण’ अशी उपमा दिली आहे. प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत मजल मारल्याचे राज्यातील, देशातील जनतेने पाहिले, ऐकले आहे.

युती गेली खड्ड्यात. आधी शेतकºयांच्या कर्जमाफीचे बोला, भाजपाच्या राजवटीतील महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे, भाजपची नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा कट आहे, पहले मंदिर फिर सरकार, गुजरात मॉडेल म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टीका करीत भाजपच्या गुजरातमधील काठावरील विजयावर, चार राज्यांतील पराभवावर तुटून पडत युवा नेता हार्दिक पटेलचे कौतुक करणारी शिवसेना कशी बदलली? उध्दवजीनी दिलेल्या ‘स्वबळा’च्या नाºयाचे काय झाले? शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपाविरोधी घेतलेली भूमिका विसरली काय? का हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता? असे सवाल जयंत पाटील यांंनी ट्विटद्वारे केले आहेत.शिवसेना भूमिका विसरली का?जयंत पाटील यांनी या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील गत चार वर्षातील टोकाच्या संघर्षाचा धागा पकडून शरसंधान साधले. उद्धव ठाकरे यांंनी स्वबळाची भाषा करूनही भाजपसोबत युती केली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने युतीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यांनी लोकहितापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांची सत्तेसाठीची इच्छा दडून राहिली नाही. गेल्या चार वर्षात शिवसेनेने मोदी सरकार व भाजपविरोधी घेतलेली भूमिका विसरली का? असा सवाल पाटील यांंनी टष्ट्वीटद्वारे केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणSangliसांगली