शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:34 IST

शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.

ठळक मुद्देभाजपवरील टीका सेनाप्रमुख विसरले का?

इस्लामपूर : शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.आ. पाटील हे अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय प्रश्नावर व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी हे ट्विट करीत शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

आ. पाटील म्हणाले, शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै. सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकार व भाजपची लक्तरे काढली आहेत. शिवसेनेने मोदी सरकारची ‘जुलमी ब्रिटिश राजवटी’शी तुलना करून या सरकारला झोपाळू ‘कुंभकर्ण’ अशी उपमा दिली आहे. प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत मजल मारल्याचे राज्यातील, देशातील जनतेने पाहिले, ऐकले आहे.

युती गेली खड्ड्यात. आधी शेतकºयांच्या कर्जमाफीचे बोला, भाजपाच्या राजवटीतील महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे, भाजपची नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा कट आहे, पहले मंदिर फिर सरकार, गुजरात मॉडेल म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टीका करीत भाजपच्या गुजरातमधील काठावरील विजयावर, चार राज्यांतील पराभवावर तुटून पडत युवा नेता हार्दिक पटेलचे कौतुक करणारी शिवसेना कशी बदलली? उध्दवजीनी दिलेल्या ‘स्वबळा’च्या नाºयाचे काय झाले? शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपाविरोधी घेतलेली भूमिका विसरली काय? का हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता? असे सवाल जयंत पाटील यांंनी ट्विटद्वारे केले आहेत.शिवसेना भूमिका विसरली का?जयंत पाटील यांनी या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील गत चार वर्षातील टोकाच्या संघर्षाचा धागा पकडून शरसंधान साधले. उद्धव ठाकरे यांंनी स्वबळाची भाषा करूनही भाजपसोबत युती केली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने युतीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यांनी लोकहितापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांची सत्तेसाठीची इच्छा दडून राहिली नाही. गेल्या चार वर्षात शिवसेनेने मोदी सरकार व भाजपविरोधी घेतलेली भूमिका विसरली का? असा सवाल पाटील यांंनी टष्ट्वीटद्वारे केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणSangliसांगली