शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

भाजपचे नाराज २२, गळाला लागले ९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर आता नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर आता नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या ४३ नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २२ नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोंडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे.

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. पण, अडीच वर्षांत पारदर्शी कारभाराच्या नावावर कशीबशी सत्ता टिकली. सुरुवातीला थोड्याफार कुरबुऱ्या होत्या. पण, महापौरपद खुले होताच या कुरबुऱ्यांना असंतोषाचे स्वरूप प्राप्त झाले. पण, भाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडे कानाडोळा केला. करिष्म्यावर भरवसा ठेवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही आगामी महापौर, उपमहापौर निवडी निर्oिघ््u पार पडतील, असे वाटत होते. पण इथेच त्यांची फसगत झाली.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रमात माहीर. भाजपमधील असंतोष त्यांच्या नजरेत आला नसेल तर नवलच. सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावण्याचे नियोजन सुरू केले. तब्बल २२ नगरसेवक भाजपवर नाराज असल्याचेही दिसून आले. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढविला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

राष्ट्रवादीने १२ नगरसेवकांशी अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनपासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला. त्यातील तीन जणांना शहराबाहेर हलविण्याचा डाव फसला. पण नऊ जण मात्र अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील दोघेजण परतले आहे. त्यातील एकाला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर परतावे लागले. तर, एकाला घरगुती अडचणीमुळे माघारी यावे लागले. पण, ते परत आले असले तरी भविष्यात मनाने भाजपसोबत कितपत राहतील, हा प्रश्न आहेच. भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कारभारापासून स्वत: नेहमीच दूर ठेवले आहे. त्यामागे त्यांचे स्वत:चे राजकारण आहे. पण, याच नेत्यांमुळे जनतेने महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा हाकत आहेत. त्यातून नगरसेवकांच्या इच्छा, आकांक्षा बेदखल झाल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे.

चौकट

सत्तेचा सोपान मदनभाऊंनाच लखलाभ

महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत तीनवेळा मदन पाटील यांची सत्ता होती. तर, एकदा विकास महाआघाडी तर आता भाजपची सत्ता आहे. मदनभाऊंच्या सत्ताकाळातही नगरसेवकांत पदासाठी चढाओढ होत असे. अर्ज भरेपर्यंत त्यांच्या गटातील नगरसेवकांतही नाराजी, रुसवेफुगवे होत. पण, शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांचा कालखंड पूर्ण होत असे. महाआघाडीच्या काळात अडीच वर्षानंतर सत्तेला सुरुंग लावला होता. आताही भाजपची वाटचाल त्याच मार्गावर आहे. त्यातून सत्ता टिकविण्यात भाजपला कितपत यश येते, हे मंगळवारी स्पष्ट होईल.