शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:03 IST

देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या.

इस्लामपूर : भाजप हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. देशहिताचा विचार आणि संघटनात्मक कामाला प्राधान्य देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षात सन्मान केला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमतासह सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी केले.येथील प्रकाश शिक्षण संकुलाच्या सभागृहात बघेल यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांतील पक्षाच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मतदारसंघाचे प्रभारी आ. गोपीचंद पडळकर अध्यक्षस्थानी होते.बघेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व कार्यकर्ते देश सेवकाच्या भूमिकेतून काम करत आहेत. शहरासह ग्रामीण विभागाच्या विकासावर भर दिला आहे. देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या आहेत.यावेळी आ. पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खा. संजय पाटील, भगवानराव साळुंखे, हिंदूराव शेळके, विठ्ठल पाटील, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले, अशोकराव माने, तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, माजी अध्यक्ष प्रसाद पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, अशोकराव खोत, सतेज पाटील, संजय हवलदार, एल. एन. शहा, प्रवीण परीट, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले, संदीप सावंत, अक्षय कोळेकर, निवास पाटील, दादासाहेब रसाळ, यदूराज थोरात, रामभाऊ शेवाळे उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरBJPभाजपा