शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Maharashtra Vidhan Sabha 2019: बंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:22 IST

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.

ठळक मुद्देबंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हाननेत्यांनी छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगलीविधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीसाठी दबाव होता. पण, अखेरच्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समजूत काढल्यामुळे त्यांनी अर्ज भरला नाही.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सत्यजित देशमुख यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण भाजपने पहिल्याच यादीत शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी जाहीर करून देशमुख गटाला धक्का दिला. पण त्यांची समजूत काढण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले. मात्र तिसरे इच्छुक महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी मात्र शिराळ्यातून बंडखोरी केली आहे. महाडिक भाजपमध्ये नसले तरी ते पक्षाच्या निकट असून, त्यांच्या उमेदवारीचा फटका बसणार असल्याने भाजपचे नेते त्यांना थांबवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.सांगलीत भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपचे कवलापूर जिल्हा परिषद गटातील शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे या बुधगाव (ता. मिरज) जिल्हा परिषद गटात भाजपच्या सदस्या आहेत. ग्रामीण भागात डोंगरे गटाचे वर्चस्व असल्यामुळे त्यांची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. डोंगरे यांचे बंड थोपविण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.इस्लामपुरात भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही शिवसेना उमेदवार गौरव नायकवडी यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भोसले-पाटील गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष चालू आहे. उमेदवारीच्या माध्यमातून हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलविरोधी गटाची रयत विकास आघाडी यानिमित्ताने फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

खोत यांचे गौरव नायकवडी यांना पाठबळ असल्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात ते यशस्वी झाले.जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात गेल्या वर्षभरापासून एक गट कार्यरत होता.

डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी, भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण अखेरच्या टप्प्यात जगताप उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यामुळे डॉ. आरळी यांनी बंडखोरी करुन अर्ज दाखल केला आहे. जगतापविरोधकांना एकत्रित करुन तगडे आव्हान देण्याची त्यांची तयारी सुरु आहे. भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची मनधरणीच्या प्रयत्नात आहेत.मिरज विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याविरोधात त्यांचे समर्थक महापालिका नगरसेवक आनंदा देवमाने यांच्या पत्नी शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीमध्ये मिरजेची जागा स्वाभिमानीला गेली आहे. स्वाभिमानीने शुभांगी देवमाने यांना उमेदवारी दिली आहे.खानापूर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी आमदार अनिल बाबर यांना मिळाली आहे. बाबर यांच्याविरोधात आटपाडीतील भाजपचे नेते अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर गटाने छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली