शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करतात- पृथ्वीराज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 21:12 IST

सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली.

सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपा नेत्यांनी सुरू केले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीतील एका कार्यक्रमात महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार पृथ्वीराज पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, ज्यांना जनतेमधून निवडून येता आले नाही, त्यांनी जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करू नये. जयंत पाटील यांच्या घरी सांत्वनाला जाऊन आल्यानंतर किमान त्यांच्याबद्दल तरी काही न बोलण्याचे पथ्य त्यांनी पाळायला हवे होते, मात्र त्यांना जयंतरावांच्या घरच्या सुतकाचेही भान राहिले नाही. अशाप्रकारचे राजकारण वरिष्ठ पदाचे मंत्री म्हणून त्यांना शोभत नाही.पदवीधर मतदारसंघात ते अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊनच निवडून आले हे जगजाहीर आहे. उलट डॉ. कदम व जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी ३0 ते ३५ वर्षे आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना मतदारसंघ बघा म्हणण्याइतपत तुम्ही मोठे झाला नाहीत. कोल्हापुरात तुमच्या होम पिचवरच महापालिका, विधान परिषद निवडणुकीत तुम्हाला काँग्रेसने धूळ चारली हे विसरला का? सर्वपक्षीय आघाडी करूनही तुम्ही तोंडघशी पडलात. सांगलीचे पाणी तुम्हाला पचणार नाही.पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीच्या निकालाने भाजपची अवस्था ह्यबाल बाल बचेह्ण अशी आहे. त्यामुळे मोदी लाट आता संपली आहे. तुमचे इनकमिंग बंदच झाले आहे. आताही महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून नाराज उमेदवारीवर तुम्ही सत्तेची स्वप्ने पाहात आहात, असे ते म्हणाले.उसन्या उमेदवारांवर उसने अवसानमहापालिका निवडणूक त्यांनी मूळ भाजपवासियांना तिकिट देऊन लढवून दाखवावी. त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. केवळ उसन्या उमेदवारांवर विजयाचे उसने अवसान चंद्रकांतदादा आणत आहेत. त्यांची ताकद केवळ आयात उमेदवारांचीच आहे. मूळ कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी पक्षीय ताकद सिद्ध करून दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी दिले. आतापर्यंत विकासकामांना त्यांनीकधीच वेळ दिला नाही. निवडणुकीसाठी कामे अडवून शहराला वेठीस धरत आहेत, अशी टीका पृथ्वीराज पाटील यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगली