शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:43 PM

मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देभाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्यापृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा

सांगली : मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.सांगली मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, आ. रामहरी रुपनवर, माजी महापौर हारुण शिकलगार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, मनगू सरगर उपस्थित होते. काठी व घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाठग, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटे ठग आहेत. भाजप हा अल्पसंख्याक व दीन-दलितांचा पक्ष नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कधीही सामाजिक न्याय मिळणार नाही. इतर धर्मांची पायमल्ली सरकारने केली आहे. भाजपचे नेते सतत दुसऱ्या धर्मांबद्दल अनादराची भावना प्रदर्शित करीत आहेत. सर्वांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडल आयोगाला त्यांनी विरोध केला होता. सत्तेवर आल्यानंतरही त्यांचे तेच धोरण कायम आहे. संविधानाबद्दल प्रेम नसलेल्या भाजप-सेनेकडून सामान्यांना न्याय मिळणार नाही.

भाजपकडून आजपर्यंत शून्य विकास झालेला आहे. केवळ मुखी विकास आणि कृती काहीच नाही. आम्ही घटना बदलण्यासाठी निवडून आलोय,असे ते ठामपणे सांगत आहेत. हिंदू महासभा, बजरंग दलाचे लोक घटनेविरोधात आहेत. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर येताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. अद्याप हा समाज आरक्षणापासून वंचितच राहिला आहे. धनगर समाजाने भाजपला मतदान करू नये.

टॅग्स :sangli-acसांगलीvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस