शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:28 IST

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळावरच राज्यभर वाचाळवीर फोफावले, सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा

सांगली : भाजपच्याच काळात राजकारणाचा स्तर घसरला असून त्यांनी पोसलेल्या वाचाळवीरांनी वातावरण दूषित केले आहे. भाजपने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नीचतम पातळीवर नेऊन ठेवले, अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमवारी सांगलीत केली.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकाराने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये राज्यभरातील नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.मोर्चा राम मंदिर चौक, पंचमुखी मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बालाजी चौकमार्गे जुन्या स्टेशन चौकात आला. याठिकाणी निषेध सभा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील पाटील, अमोल कोल्हे, विशाल पाटील, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, डॉ. विश्वजित कदम, अरुण लाड, नीलेश लंके, माजी आमदार राजू आवळे, मिलिंद कांबळे, मानसिंगराव नाईक, माजी मंत्री राजेश टोपे, सक्षणा सलगर, उद्धवसेनेचे रणजित बागल, प्रा. यशवंत गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.शशिकांत शिंदे म्हणाले, एकदा पोलिसांकडून सूट द्या, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सडेतोड उत्तर देईल. भाजपने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली. अनेक नेते फोडले, पण जयंत पाटील ठाम राहिल्यानेच भाजपने त्यांच्यामागे षडयंत्र लावले. अशी भाषा पुन्हा निघाली, तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असेल. एकाच्या बोलण्याने संपूर्ण महाराष्ट्र सरकारची निंदा करीत आहे.रोहित पवार म्हणाले, हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा लढा आहे. आम्हीही काहीवेळा आक्रमक बोलतो, पण मूळ विचार सोडत नाही. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. तुम्ही जाहिरात देऊन नटसम्राट होऊ शकता, पण लोकनेता होणार नाही. राज्यात गलिच्छ राजकारण या सरकारने आणले. भाजपच्या काळात महामानवांबद्दल वाट्टेल ते बोलले जात आहे.यावेळी अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, नीलेश लंके, राजेश टोपेे, खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, आमदार उत्तम जानकर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, सक्षणा सलगर, दिलीप पाटील आदींची भाषणे झाली.

जयंत पाटील यांचे नाव येईल, म्हणून गप्पजिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, पडळकर यांना धडा शिकविण्यास वेळ लागणार नाही. आमच्या पद्धतीने आम्ही त्यांचा बंदोबस्त केला तर जयंत पाटील यांचे नाव त्यात गोवले जाईल म्हणून आम्ही गप्प आहोत. तरीही यापुढे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याविषयी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ.

लोकशाहीसाठी धोक्याची घंटामाजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, वाचाळवीरांची संख्या वाढल्याने राजकारणाची बदनामी होत आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुण वर्ग राजकारणात येण्यास इच्छुक दिसत नाहीत. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.