शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सुटीतील पोषण आहारास बायोमेट्रिकचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:16 IST

टंचाईग्रस्त १७७ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला पाठविला आहे.

सांगली : टंचाईग्रस्त १७७ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. पोषण आहारातील बोगसगिरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. प्रत्यक्षात एकाही शाळेत बायोमेट्रिक हजेरीची सोय नाही. शासनाच्या नवीन धोरणामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४५० गावे दुष्काळग्रस्त यादीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतेच आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील किती गावांमध्ये पोषण आहार द्यावा लागेल, याचे प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांकडून सर्वेक्षण केले आहे. १७७ गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्यात दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात येणार आहे.

शासनाने यावर्षीपासून नवीन बदल केला असून, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेऊनच पोषण आहार देण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील किती शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी आहे, याची माहिती मागविली होती. यावर सर्वच गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील एकाही शाळेत तशी व्यवस्थाच नसल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे. बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळे १७७ गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली