शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

By संतोष भिसे | Updated: March 10, 2024 16:24 IST

सांगली-कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची परीक्षा

सांगली : कोल्हापूर ते सांगलीदरम्यान डेमू पॅसेंजर रेल्वेचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला. 

सातारा ते कोल्हापूर-सातारादरम्यान सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेबाबत प्रशासनाची अनास्था संताप आणणारी आहे. डेमूच्या डब्यांमध्ये अस्वच्छता, गाडी विलंबाने धावणे हे प्रकार रोजचेच आहेत. गेल्या काही महिन्यांत डेमू गाडीच्या नादुरुस्त्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. 

शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कोल्हापुरातून सुटलेली सांगली पॅसेंजर रुकडीमध्ये येताच अंधारात बुडून गेली. डब्यांतील वीजपुरवठा बंद झाला. सर्व दिवे आणि पंखे बंद पडले. प्रवाशांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरु करुन उजेडाचा प्रयत्न केला. यादरम्यान, महिला प्रवाशांना चोरीमारीपासून सावध राहण्याची वेळ आली. 

पुढील स्थानकात दिवे सुरु होतील या अपेक्षेने प्रवासी शांत होते, पण प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंधारे डबे तसेच धावत राहिले. हातकणंगले स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी डेमू थांबली. त्यावेळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे कर्मचारी पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सर्व डबे प्रकाशमान झाले.

लाल डेमू भंगारात पाठवाप्रवाशांनी सांगितले की, लाल डेमूचे इंजिन सतत नादुरुस्त होते. सकाळी धावणारी सातारा-कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची आहे. सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार कोल्हापूरला जातात. ही गाडी सकाळी ९.५० वाजता कोल्हापुरात पोहोचण्याची वेळ आहे. पण इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने विलंबाने धावते. पंधरवड्यापूर्वी तर चक्क बारा वाजता पोहोचली होती. बिघाडामुळे तिची गती मंदावली होती. ताशी २०-३० किलोमीटर या गडीने डेमू धावत होती. या गाडीने प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली. 

तिकीट वाढवा, पण चांगली सेवा द्यारेल्वेने कोरोनाकाळात वाढवलेले तिकीटांचे दर नुकतेच पूर्ववत केले. मिरज ते कोल्हापूर हे ३० रुपये प्रवासभाडे पुन्हा १५ रुपयांवर आणले. रेल्वेने प्रसंगी भाडे वाढवले तरी चालेल, पण सेवा चांगली द्यावी अशी प्रवाशांची भावना आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSangliसांगलीkolhapurकोल्हापूर