शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
3
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
4
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
5
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
6
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
7
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
8
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
9
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
10
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
11
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
13
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
14
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
15
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
16
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
17
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
18
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
19
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
20
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

By संतोष भिसे | Updated: March 10, 2024 16:24 IST

सांगली-कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची परीक्षा

सांगली : कोल्हापूर ते सांगलीदरम्यान डेमू पॅसेंजर रेल्वेचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला. 

सातारा ते कोल्हापूर-सातारादरम्यान सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेबाबत प्रशासनाची अनास्था संताप आणणारी आहे. डेमूच्या डब्यांमध्ये अस्वच्छता, गाडी विलंबाने धावणे हे प्रकार रोजचेच आहेत. गेल्या काही महिन्यांत डेमू गाडीच्या नादुरुस्त्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. 

शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कोल्हापुरातून सुटलेली सांगली पॅसेंजर रुकडीमध्ये येताच अंधारात बुडून गेली. डब्यांतील वीजपुरवठा बंद झाला. सर्व दिवे आणि पंखे बंद पडले. प्रवाशांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरु करुन उजेडाचा प्रयत्न केला. यादरम्यान, महिला प्रवाशांना चोरीमारीपासून सावध राहण्याची वेळ आली. 

पुढील स्थानकात दिवे सुरु होतील या अपेक्षेने प्रवासी शांत होते, पण प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंधारे डबे तसेच धावत राहिले. हातकणंगले स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी डेमू थांबली. त्यावेळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे कर्मचारी पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सर्व डबे प्रकाशमान झाले.

लाल डेमू भंगारात पाठवाप्रवाशांनी सांगितले की, लाल डेमूचे इंजिन सतत नादुरुस्त होते. सकाळी धावणारी सातारा-कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची आहे. सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार कोल्हापूरला जातात. ही गाडी सकाळी ९.५० वाजता कोल्हापुरात पोहोचण्याची वेळ आहे. पण इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने विलंबाने धावते. पंधरवड्यापूर्वी तर चक्क बारा वाजता पोहोचली होती. बिघाडामुळे तिची गती मंदावली होती. ताशी २०-३० किलोमीटर या गडीने डेमू धावत होती. या गाडीने प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली. 

तिकीट वाढवा, पण चांगली सेवा द्यारेल्वेने कोरोनाकाळात वाढवलेले तिकीटांचे दर नुकतेच पूर्ववत केले. मिरज ते कोल्हापूर हे ३० रुपये प्रवासभाडे पुन्हा १५ रुपयांवर आणले. रेल्वेने प्रसंगी भाडे वाढवले तरी चालेल, पण सेवा चांगली द्यावी अशी प्रवाशांची भावना आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSangliसांगलीkolhapurकोल्हापूर