शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप 

By संतोष भिसे | Updated: March 16, 2024 18:09 IST

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले ...

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. सांगलीत २३ मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या तयारीसाठी आज, शनिवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे बैठक झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.शेटफळे (ता. आटपाडी), घाटनांद्रे, तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी, नागाव कवठे (ता. तासगाव) येथेही बैठका झाल्या. त्यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी मार्गदर्शन केले. देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला किंवा धार्मिक स्थळे जोडण्याला आमचा विरोध नाही. पण हजारो एकर जमीन महामार्गात जाऊन शेतीवर नांगर चालणार असेल, तर महामार्ग कशासाठी? हा प्रश्न आहे.खराडे म्हणाले, महामार्गाला विरोधासाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आहेत. सांगलीतील शनिवारच्या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आजवर पवनचक्क्या, रत्नागिरी- नागपूर महामार्ग, राज्यमार्ग, गुहागर-विजापूर महामार्ग यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत, पण त्यातून ते सुखी झालेले नाहीत. आता शासनाने शक्तिपीठच्या रुपाने नवे संकट लादू नये. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनीही महामार्गाविरोधात तीव्र भूमिका व्यक्त केल्या. बैठकीला प्रभाकर पाटील, सुनील पवार, पी. वाय. भोसले, गुलाम मुलाणी, किशोर कोडग, शरद पवार, भालचंद्र कोडग, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, विशाल गायकवाड, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, गुलाबराव गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

आता कोठे चांगले दिवस येताहेत..साखळकर म्हणाले, महामार्गामुळे नदीकाठच्या गावात महापुराचे संकट गडद होणार आहे. कोणीही मागणी केलेली नसताना नव्या शक्तिपीठ महामार्गाचे प्रयोजन काय? याचे उत्तर शासनाने द्यावे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील शेतीमध्ये सोने पिकू लागले आहे. तेथे महामार्गासाठी नांगर चालविण्याचे पाप शासनाने करु नये. महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी