शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप 

By संतोष भिसे | Updated: March 16, 2024 18:09 IST

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले ...

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. सांगलीत २३ मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या तयारीसाठी आज, शनिवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे बैठक झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.शेटफळे (ता. आटपाडी), घाटनांद्रे, तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी, नागाव कवठे (ता. तासगाव) येथेही बैठका झाल्या. त्यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी मार्गदर्शन केले. देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला किंवा धार्मिक स्थळे जोडण्याला आमचा विरोध नाही. पण हजारो एकर जमीन महामार्गात जाऊन शेतीवर नांगर चालणार असेल, तर महामार्ग कशासाठी? हा प्रश्न आहे.खराडे म्हणाले, महामार्गाला विरोधासाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आहेत. सांगलीतील शनिवारच्या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आजवर पवनचक्क्या, रत्नागिरी- नागपूर महामार्ग, राज्यमार्ग, गुहागर-विजापूर महामार्ग यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत, पण त्यातून ते सुखी झालेले नाहीत. आता शासनाने शक्तिपीठच्या रुपाने नवे संकट लादू नये. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनीही महामार्गाविरोधात तीव्र भूमिका व्यक्त केल्या. बैठकीला प्रभाकर पाटील, सुनील पवार, पी. वाय. भोसले, गुलाम मुलाणी, किशोर कोडग, शरद पवार, भालचंद्र कोडग, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, विशाल गायकवाड, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, गुलाबराव गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

आता कोठे चांगले दिवस येताहेत..साखळकर म्हणाले, महामार्गामुळे नदीकाठच्या गावात महापुराचे संकट गडद होणार आहे. कोणीही मागणी केलेली नसताना नव्या शक्तिपीठ महामार्गाचे प्रयोजन काय? याचे उत्तर शासनाने द्यावे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील शेतीमध्ये सोने पिकू लागले आहे. तेथे महामार्गासाठी नांगर चालविण्याचे पाप शासनाने करु नये. महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी