इस्लामपुरात घराघरांत पोहोचण्याच्या राष्ट्रवादीच्या उपक्रमाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:36+5:302021-09-02T04:58:36+5:30
इस्लामपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित ‘योजना आपल्या दारी’ या ...

इस्लामपुरात घराघरांत पोहोचण्याच्या राष्ट्रवादीच्या उपक्रमाची सुरुवात
इस्लामपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित ‘योजना आपल्या दारी’ या शिबिरास शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ परिसरातील २१६ नागरिकांनी घेतला.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील यांच्या हस्ते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील उपस्थित होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि युवानेते प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या शिबिरामध्ये ७८ नागरिकांच्या आधार कार्डच्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रारंभीच्या वैशाली शिंदे, कोमल वायदंडे, रेखा वायदंडे, विजयकुमार शिंदे, ओंकार शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पोहाेच देण्यात आली. ५६ नागरिकांच्या पॅन कार्डच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना पोहाेच दिली. यावेळी १७ नागरिकांना विविध दाखले, तर ६ नागरिकांच्या पेन्शन योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. उर्वरित नागरिकांना विविध योजना व दाखल्यांच्या कागदपत्रांची माहिती दिली आहे. त्याची पूर्तता अभियानचे संघटक करून घेणार आहेत.
युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक राजाराम जाधव, विनायक सदावर्ते, राहुल नागे, रणजित तेवरे, जमीर मगदुम, प्रवीण चव्हाण, तसेच शकील जमादार, विशाल सूर्यवंशी, गोपाळ नागे, मोहन भिंगार्डे, सूर्याजी पाटील, गंगाराम शिंगाडे, अलका शहा, प्रियांका साळुंखे, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, योगीता माळी, सुनीता काळे, अभिजित पाटील, सागर चव्हाण, धीरज भोसले, वैभव भोसले, प्रशांत कदम यांनी परिश्रम घेतले.
फोटो : ०१ इस्लामपुर २
ओळी : इस्लामपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या शिबिराचे उदघाटन प्रा. श्यामराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शहाजी पाटील, पै. भगवान पाटील, डॉ. संग्राम पाटील उपस्थित होते.