शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

By संतोष भिसे | Updated: March 5, 2024 13:56 IST

मणेराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात; एकरी दोन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

संतोष भिसेसांगली : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा महामार्ग कोणत्या गावांतून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले. कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांतून ८०२ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. तो सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतून जाणार आहे. कवठेमहांकाळमधील जमिनी दुष्काळी आहेत. तासगाव आणि मिरज तालुक्यांतील जमिनी मात्र सुपीक आणि नदीकाठच्या आहेत. सध्या तेथे हजारो टन ऊस, द्राक्षे, हळद आदी बागायती पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा मोठा आहे. आता महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार आहे. ऊस व द्राक्षपट्टा उद्ध्वस्त होणार आहे.भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे. शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत आक्षेप घेऊ शकतात, पण प्रकल्प अडवू शकत नाहीत. त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला, तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भरभक्कम भरपाई मिळाली. त्यानंतर सरकारने भरपाईच्या नियमात बदल केले, त्यामुळे शक्तीपीठसाठी तितक्या भरपाईची शक्यता नाही. महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी दोन कोटी रुपयांसाठी वज्रमूठ केली आहे. महापालिका क्षेत्रात एकरी चार कोटींची मागणी आहे.दरम्यान, महामार्गाची आणि भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्याने महामार्ग क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध लागू झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील या गावांत भूसंपादनकवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी. तासगाव तालुका : सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

सर्वाधिक संपादन मणेराजुरी, कवलापुरातमणेराजुरीमधील १५२ गट संपादित केले जाणार आहेत. गव्हाण ११, सावर्डे १, मतकुणकी ३९, नागावकवठे १००, वज्रचौंडे ४७, अंजनी ५६, सावळज, सिद्धेवाडी ३ गट संपादित केले जातील. सांगलीवाडीत ५३, पद्माळेत ४४, कर्नाळमध्ये ६५, माधवनगरमध्ये १०७, बुधगावमध्ये ९६ व कवलापुरात १४५ गटांमध्ये भूमीसंपादन होईल. डोंगरसोनीमध्ये ६२, घाटनांद्रेमध्ये १०३, तिसंगीमध्ये ५१ गटांतील शेती घेतली जाणार आहे.

आज सांगलीत, उद्या कवलापुरात बैठकशक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीत मंगळवारी (दि. ५) आयोजित केली आहे. पंचमुखी मारुती रस्त्यावर कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होईल. स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयोजन केले आहे.दुसरी बैठक कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी (दि. ६) होणार आहे. सिद्धेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता शेतकरी एकत्र येतील. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने आयोजन केले आहे. दोन्ही बैठकांत महामार्गासाठी भूसंपादन व भरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे. संयोजक दिगंबर कांबळे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी