शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

By संतोष भिसे | Updated: March 5, 2024 13:56 IST

मणेराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात; एकरी दोन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

संतोष भिसेसांगली : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा महामार्ग कोणत्या गावांतून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले. कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांतून ८०२ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. तो सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतून जाणार आहे. कवठेमहांकाळमधील जमिनी दुष्काळी आहेत. तासगाव आणि मिरज तालुक्यांतील जमिनी मात्र सुपीक आणि नदीकाठच्या आहेत. सध्या तेथे हजारो टन ऊस, द्राक्षे, हळद आदी बागायती पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा मोठा आहे. आता महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार आहे. ऊस व द्राक्षपट्टा उद्ध्वस्त होणार आहे.भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे. शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत आक्षेप घेऊ शकतात, पण प्रकल्प अडवू शकत नाहीत. त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला, तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भरभक्कम भरपाई मिळाली. त्यानंतर सरकारने भरपाईच्या नियमात बदल केले, त्यामुळे शक्तीपीठसाठी तितक्या भरपाईची शक्यता नाही. महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी दोन कोटी रुपयांसाठी वज्रमूठ केली आहे. महापालिका क्षेत्रात एकरी चार कोटींची मागणी आहे.दरम्यान, महामार्गाची आणि भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्याने महामार्ग क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध लागू झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील या गावांत भूसंपादनकवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी. तासगाव तालुका : सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

सर्वाधिक संपादन मणेराजुरी, कवलापुरातमणेराजुरीमधील १५२ गट संपादित केले जाणार आहेत. गव्हाण ११, सावर्डे १, मतकुणकी ३९, नागावकवठे १००, वज्रचौंडे ४७, अंजनी ५६, सावळज, सिद्धेवाडी ३ गट संपादित केले जातील. सांगलीवाडीत ५३, पद्माळेत ४४, कर्नाळमध्ये ६५, माधवनगरमध्ये १०७, बुधगावमध्ये ९६ व कवलापुरात १४५ गटांमध्ये भूमीसंपादन होईल. डोंगरसोनीमध्ये ६२, घाटनांद्रेमध्ये १०३, तिसंगीमध्ये ५१ गटांतील शेती घेतली जाणार आहे.

आज सांगलीत, उद्या कवलापुरात बैठकशक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीत मंगळवारी (दि. ५) आयोजित केली आहे. पंचमुखी मारुती रस्त्यावर कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होईल. स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयोजन केले आहे.दुसरी बैठक कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी (दि. ६) होणार आहे. सिद्धेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता शेतकरी एकत्र येतील. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने आयोजन केले आहे. दोन्ही बैठकांत महामार्गासाठी भूसंपादन व भरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे. संयोजक दिगंबर कांबळे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी