इस्लामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:06+5:302021-02-09T04:30:06+5:30

इस्लामपूर : नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील पुतळे आणि त्यांचा परिसर दुर्लक्षित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग्या झालेल्या ...

The beautification of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj begins in Islampur | इस्लामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण सुरू

इस्लामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण सुरू

इस्लामपूर : नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील पुतळे आणि त्यांचा परिसर दुर्लक्षित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने येथील तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. एक लाख रुपयांचा खर्च या पुतळा सुशोभिकरणावर होणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

येथील तहसील कार्यालयासमोर लोकवर्गणीतून नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता व दैनंदिन पूजन करण्याचे काम शिवप्रतिष्ठानकडून केले जाते. याच परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज पुष्पहार अर्पण करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रंग वातावरणीय परिणामामुळे बदलला होता. तसेच येथील पाण्याचा कारंजा गेल्या काही दिवसांपासून बंद होता. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये सोमवारी पुतळ्याच्या रंगरंगोटीची आवश्यकता असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आल्यावर, पालिका प्रशासनाने सोमवारी सायंकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रंगरंगोटीची लगबग सुरू केली होती.

फोटो- ०८०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज १ : इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभिकरणासाठी सुरू झालेली लगबग.

Web Title: The beautification of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj begins in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.