शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीसचे दर गडगडले : कारखान्यांसमोर अडथळ्यांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:07 IST

सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत.

अशोक डोंबाळे ।सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत. प्रतिटन बगॅसचे २२०० वरुन १६९० रुपये, मोलॅसीसचे ६५०० रुपयांवरुन ३५०० रुपयांपर्यंत दर गडगडले आहेत. साखर उद्योग अडचणीत येण्यास व्यापाºयांचा मनमानी कारभार आणि साठेबाजी कारणीभूत असल्याचा जाणकारांचा आरोप आहे. याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले त्यावेळी प्रतिक्विंटल साखरेला ३६०० रुपये दर होता. नोंव्हेंबर, डिसेंबर २०१७, जानेवारी २०१८ अशा तीन महिन्यांच्या कालावधित साखरेचे दर कमीच होत आहेत. दि. ६ फेब्रुवारीला तो दर प्रति क्विंटल २८०० रुपयांपर्यंत खाली आला होते. केंद्र आणि राज्य शासनाने साखर खरेदीसह आयात शुल्कात वाढ केल्यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. सध्या प्रति क्विंटल ३२०० रुपयांपर्यंत साखरेचे दर पोहोचले आहेत. दराच्या वाढीचा विचार न करताच कारखानदारांनी एकत्रित येत दोन दिवसांपूर्वी प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. दर कमी होत असले तरीही एफआरपी अधिक २०० ही रक्कम देण्याची घोषणा केल्याप्रमाणे देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे.

साखरेच्या उतरत्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांनी सावरले होते. तोपर्यंत गेल्या पंधरा दिवसांत बगॅसचे दर प्रतिटन २२०० रुपयांवरुन १६९० रुपये झाला आहे. प्रतिटन पाचशे रुपयांनी कारखानदारांना फटका बसला आहे. ही तूट भरुन काढण्याचेही मोठे आव्हान आहे.

मोलॅसीसचे दर प्रतिटन तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. हंगाम सुरू झाला, त्यावेळी प्रतिटन सहा हजार ५०० रुपये होता. तो सध्या तीन हजार ५०० रुपये झाला आहे.साखर कारखाने इथेनॉलही तयार करत आहेत. तसे पाहिले तर, साखरेचे दर गडगडतात त्यावेळी ब्राझीलसारखा देश इथेनॉल निर्मितीला सर्वाधिक पसंती देतो.तेथील सरकारचेच तसे धोरण असल्याने साखरेचे दर गडगडले तरी, साखर उद्योग कधीच अडचणीत येत नाही. तेथे पेट्रोलमध्ये सक्तीने इथेनॉलचा वापरही केला जातो.को-जनरेशन प्रकल्प : दरामुळे अडचणीतविजेची टंचाई दूर करण्यासाठी को-जनरेशन (सहवीज) प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन म्हणून ६ रुपये ५३ पैशांनी खात्रीशीर वीज खरेदीची शासनाने हमी दिली होती. म्हणूनच जिल्ह्यात असे प्रकल्प वाढले. सध्या विजेचा पुरवठा चांगला झाल्यामुळे राज्य सरकारची भूमिका लगेच बदलल्याचे दिसत आहे. गतवर्षी सरकार कारखानदारांकडून प्रतियुनिट ६ रुपये ५३ पैसे दराने वीज खरेदी करीत होते. यामध्ये प्रति युनिट २९ पैसे दर कमी होऊन तो ६ रुपये २४ पैसे प्रति युनिट झाला आहे. 

साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीस, इथेनॉलचे दर उतरले आहेत. दर उतरले असताना साखरेसह उपपदार्थांची विक्री करु नये, हे आम्हालाही कळते. पण, शेतकºयांची बिले आठ दिवसात द्यावी लागतात, त्यासाठी पैस कुठून जमा करणार आहे. तसेच भविष्यात साखरेसह उपपदार्थाचे दर वाढतील याचीही खात्री नाही. या अडचणीवर सरकारनेच ठोस आणि दीर्घ स्वरुपाचे धोरण तयार करण्याची गरज आहे- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडलसुगीच्या दिवसात सर्वच शेतीमालाचे दर पडतात. त्यानुसारच साखर, बगॅसचे दर गडगडले आहेत. कारखानदारांनी साठे करुन ठेवावेत. आता तर २५ टक्के साखर प्रति क्विंटल ३२०० रुपयांनी खरेदीचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांनी साखर विक्री, बगॅस, मोलॅसीस विक्रीसाठी साखर कारखान्यांनी गडबड करु नये. भविष्यात निश्चित साखरेचे दर वाढतील- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली