शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

पतंगरावांच्या दरबारी दोन्ही गटांची हजेरी

By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST

पदाधिकाऱ्यांचा सत्कार : पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र अजूनही कायम...

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते पतंगराव कदम यांच्या पाचच मिनिटांच्या भेटीसाठी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पतंगराव लगेचच गेल्यामुळे, दुसऱ्या गटाला नुसतीच हजेरी लावून परतावे लागले. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीवेळी इद्रिस नायकवडी यांच्या गटाने पक्षांतर्गत बंडाचे निशाण फडकविले होते. वंदना कदम यांना उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ऐनवेळी त्यांनी माघार घेतली असली तरी, गटबाजीचे निशाण अजूनही फडकतच आहे. रविवारी सत्ताधारी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचा सांगलीत धावता दौरा होता. तरीही महापालिकेचे नूतन महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, सुरेश आवटी, नगरसेवक दिलीप पाटील व अन्य नगरसेवकांनी दुपारी अडीच वाजता त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कदम सांगलीत आले होते. हातकणंगलेकर यांच्या कुटुंबियांना भेटून ते निवासस्थानी परत आले. त्यावेळी त्यांच्या कक्षात नवे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. बाहेरील बाजूस वंदना कदम व त्यांचे पती सच्छिदानंद कदम उपस्थित होते. इद्रिस नायकवडीही त्याठिकाणी होते. दोन्ही गटांनी सवतासुभा मांडल्याचे दिसत होते. पतंगराव येताच नव्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच पतंगरावांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. विवेक कांबळे यांना पहिल्या टप्प्यातच महापौरपद देण्याबाबत मदन पाटील यांच्याशी चर्चा झाली होती, असे सांगून त्यांनी कांबळे व पाटील यांना पारदर्शी कारभाराच्या सूचना दिल्या. भेटीचा हा कार्यक्रम पाचच मिनिटात आटोपला आणि पतंगराव निघून गेले. कदम दाम्पत्य व नायकवडी त्याठिकाणीच बाजूला होते. दोन्ही गटातील संघर्षाचा विस्तव अजूनही कायम असल्याचे या भेटीवेळी दिसून आले. पतंगरावांच्याच आदेशाने बंडखोरी केल्याचे वंदना कदम यांनी सांगितले होते. या विषयाचा उलगडा पतंगराव करतील, असे वाटत होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. (प्रतिनिधी)वादावर चर्चा न करताच ते परतले...स्थायी समिती सभापतीपद निवडीवेळीही नायकवडी यांनी बंडाचा इशारा दिला होता. त्यावेळी संजय मेंढे व नायकवडी यांच्यात समेट घडवून आणण्याचे काम पतंगरावांनी केले होते. नायकवडी यांना त्यावेळी त्यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. यावेळी महापौर-उपमहापौर निवडीतील वादात न पडणेच पतंगरावांनी पसंत केले. रविवारच्या भेटीतही त्यांनी या विषयावर चर्चा केली नाही. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष अजूनही कायम असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गटनेते किशोर जामदार यांनी, सत्ताधारी गटातील ज्या सदस्यांनी बंडखोरीचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांचा रोख इद्रिस नायकवडी, अतहर नायकवडी, शुभांगी कांबळे, वंदना कदम यांच्या दिशेने होता. लवकरच त्यांना नोटिसाही काढण्यात येतील. आता या गोष्टीवरूनही महापालिकेतील पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. नोटिसा बजावल्यानंतर दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाल्यास त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.