शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सांगलीतील कारागृह स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक बनविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 11:43 IST

सांगली : सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार असणारे कारागृह स्मारक स्वरुपात जतन करण्याविषयी शुक्रवारी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली. ...

सांगली : सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार असणारे कारागृह स्मारक स्वरुपात जतन करण्याविषयी शुक्रवारी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लढ्याचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचा निर्णयही झाला.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक कष्टकऱ्यांची दौलत येथे झाली. धनाजी गुरव म्हणाले, बहुजन समाजातील श्रमिक स्त्री- पुरुषांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळविले, पण, हा स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य प्रतिगामी नाकारत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.

सदाशिव मगदुम म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात थेट जनतेत जाऊन प्रबोधन करावे लागेल. पथनाट्ये, पदयात्रा, बैठका याद्वारे स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास लोकांसमोर मांडावा लागेल. सिंदूर लक्ष्मणसारख्या वीरांचा इतिहास अजूनही लोकांपुढे पुरेशा स्वरुपात आलेला नाही.

ॲड. सुभाष पाटील म्हणाले, सर्व सेक्युलर पक्ष, संघटनांना सोबत घेऊन व्यापक चळवळ उभी करावी लागेल. सध्याच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या काळात सत्याधारित इतिहासाची पुनर्मांडणी आवश्यक आहे.

व्ही. वाय. पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, दिग्विजय पाटील, मारुती शिरोडे, प्रा. गौतम काटकर यांनीही भूमिका मांडल्या.

८ ऑगस्ट २०२२ पर्यंत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचे ठरले. त्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय समित्या नेमण्यात आल्या. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारी चित्र प्रदर्शने, पुस्तिका, पत्रके, नाटिका, पथनाट्य यांच्या तयारीचा निर्णय झाला. प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या जाणार आहेत. १७ डिसेंबर रोजी पुणे येथे व ३० जानेवारीस सांगलीत व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे.

बैठकीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह, राष्ट्र सेवा दल, आदिवासी एकता परिषद, भटके विमुक्त संघटना, लोकायत, समाजवादी शिक्षक सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये नीरज जैन, प्रा. वासुदेव गुरव, मराठा सेवा संघाचे बाळासाहेब पाटील, लक्ष्मण चव्हाण, सागर माळी, के. डी. शिंदे, मोहनराव देशमुख, विकास मगदूम आदींचा समावेश होता.

चौकट

‘जेलफोडो’चे स्मारक

दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांनी सांगलीचे कारागृह भेदले होते. हे कारागृह सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. हे सध्या कैद्यांसाठी अपुरे ठरत असल्याने अन्यत्र उभारण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कारागृहाला स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक म्हणून जतन करण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले.

टॅग्स :Sangliसांगली