शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

सांगलीतील कारागृह स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक बनविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 11:43 IST

सांगली : सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार असणारे कारागृह स्मारक स्वरुपात जतन करण्याविषयी शुक्रवारी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली. ...

सांगली : सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार असणारे कारागृह स्मारक स्वरुपात जतन करण्याविषयी शुक्रवारी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लढ्याचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचा निर्णयही झाला.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक कष्टकऱ्यांची दौलत येथे झाली. धनाजी गुरव म्हणाले, बहुजन समाजातील श्रमिक स्त्री- पुरुषांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळविले, पण, हा स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य प्रतिगामी नाकारत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.

सदाशिव मगदुम म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात थेट जनतेत जाऊन प्रबोधन करावे लागेल. पथनाट्ये, पदयात्रा, बैठका याद्वारे स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास लोकांसमोर मांडावा लागेल. सिंदूर लक्ष्मणसारख्या वीरांचा इतिहास अजूनही लोकांपुढे पुरेशा स्वरुपात आलेला नाही.

ॲड. सुभाष पाटील म्हणाले, सर्व सेक्युलर पक्ष, संघटनांना सोबत घेऊन व्यापक चळवळ उभी करावी लागेल. सध्याच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या काळात सत्याधारित इतिहासाची पुनर्मांडणी आवश्यक आहे.

व्ही. वाय. पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, दिग्विजय पाटील, मारुती शिरोडे, प्रा. गौतम काटकर यांनीही भूमिका मांडल्या.

८ ऑगस्ट २०२२ पर्यंत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचे ठरले. त्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय समित्या नेमण्यात आल्या. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारी चित्र प्रदर्शने, पुस्तिका, पत्रके, नाटिका, पथनाट्य यांच्या तयारीचा निर्णय झाला. प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या जाणार आहेत. १७ डिसेंबर रोजी पुणे येथे व ३० जानेवारीस सांगलीत व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे.

बैठकीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह, राष्ट्र सेवा दल, आदिवासी एकता परिषद, भटके विमुक्त संघटना, लोकायत, समाजवादी शिक्षक सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये नीरज जैन, प्रा. वासुदेव गुरव, मराठा सेवा संघाचे बाळासाहेब पाटील, लक्ष्मण चव्हाण, सागर माळी, के. डी. शिंदे, मोहनराव देशमुख, विकास मगदूम आदींचा समावेश होता.

चौकट

‘जेलफोडो’चे स्मारक

दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांनी सांगलीचे कारागृह भेदले होते. हे कारागृह सांगलीच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. हे सध्या कैद्यांसाठी अपुरे ठरत असल्याने अन्यत्र उभारण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कारागृहाला स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक म्हणून जतन करण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले.

टॅग्स :Sangliसांगली