शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

इटकरेत जमावाचा हॉटेलवर हल्ला

By admin | Updated: November 19, 2014 00:19 IST

दोघे ताब्यात : वाहनांची मोडतोड; राष्ट्रपुरुषाच्या अर्धपुतळ्याची भांडणात मोडतोड

कामेरी/येलूर : किरकोळ कारणावरून दोघा व्यावसायिकांत  झालेल्या धक्काबुक्कीत चुकून राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा फुटल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. इटकरे (ता. वाळवा) येथे आज, मंगळवारी ही घटना घडली. अर्धपुतळा मोडतोडीचा प्रसार सोशल मीडियावरून झाल्यानंतर सायंकाळी संतप्त जमावाने या दोन्ही व्यावसायिकांच्या दुकानांवर हल्ला केला. हॉटेलमधील साहित्याची नासधूस व वाहनांची मोडतोड केली. सध्या गावात तणाव असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येडेनिपाणी फाट्यावर पानटपरी व त्याशेजारी किरकोळ खाद्यपदार्थांचे हॉटेल आहे. पानटपरीत राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा होता. आज दुपारी दोनच्या दरम्यान या दोन्ही व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. या धक्काबुक्कीत अर्धपुतळा खाली पडल्याने फुटला. त्याचे छायाचित्रण करून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले. यामुळे चारशेहून तरुणांचा जमाव येडेनिपाणी फाट्यावर आला. जमावाने हॉटेलवर हल्ला केला. सर्व साहित्याची मोडतोड केली. काही साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर जमाव हॉटेल व्यावसायिकाच्या इटकरेतील घरावजळ गेला. तेथील तीन मोटारींची (एमएच ०९ ई १४०४ व एमएच १० एक्यू ८३८ आणि एमएच ०९ सीएच ६०९१) मोडतोड करण्यात आली. हातात काठ्या घेऊन जमावाने धुमाकूळ घातल्याने तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाचा पाठलाग करून लोकांना पांगवले. गावात तणाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळनंतर तणावपूर्ण शांतता होती. जिल्'ातील पोलीस पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले आहे. गावातून फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.दोन्ही व्यावसायिकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेचा कोणी जाणीवपूर्वक प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)संशयितांची नावे निष्पन्न करूजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत मुंबईत आहेत. या घटनेची त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली. ते म्हणाले की, किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला आहे. मात्र, त्याचा सोशल मीडियावरून कोणी प्रसार केला, वाहनांची मोडतोड कोणी केली, याचा तपास करून सर्वांची नावे निष्पन्न करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. या घटनेचे जिल्ह्यात कोठेही पडसाद उमटू नयेत, याची काळजी घेतली आहे.