शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

इटकरेत जमावाचा हॉटेलवर हल्ला

By admin | Updated: November 19, 2014 00:19 IST

दोघे ताब्यात : वाहनांची मोडतोड; राष्ट्रपुरुषाच्या अर्धपुतळ्याची भांडणात मोडतोड

कामेरी/येलूर : किरकोळ कारणावरून दोघा व्यावसायिकांत  झालेल्या धक्काबुक्कीत चुकून राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा फुटल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. इटकरे (ता. वाळवा) येथे आज, मंगळवारी ही घटना घडली. अर्धपुतळा मोडतोडीचा प्रसार सोशल मीडियावरून झाल्यानंतर सायंकाळी संतप्त जमावाने या दोन्ही व्यावसायिकांच्या दुकानांवर हल्ला केला. हॉटेलमधील साहित्याची नासधूस व वाहनांची मोडतोड केली. सध्या गावात तणाव असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येडेनिपाणी फाट्यावर पानटपरी व त्याशेजारी किरकोळ खाद्यपदार्थांचे हॉटेल आहे. पानटपरीत राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा होता. आज दुपारी दोनच्या दरम्यान या दोन्ही व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. या धक्काबुक्कीत अर्धपुतळा खाली पडल्याने फुटला. त्याचे छायाचित्रण करून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले. यामुळे चारशेहून तरुणांचा जमाव येडेनिपाणी फाट्यावर आला. जमावाने हॉटेलवर हल्ला केला. सर्व साहित्याची मोडतोड केली. काही साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर जमाव हॉटेल व्यावसायिकाच्या इटकरेतील घरावजळ गेला. तेथील तीन मोटारींची (एमएच ०९ ई १४०४ व एमएच १० एक्यू ८३८ आणि एमएच ०९ सीएच ६०९१) मोडतोड करण्यात आली. हातात काठ्या घेऊन जमावाने धुमाकूळ घातल्याने तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाचा पाठलाग करून लोकांना पांगवले. गावात तणाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळनंतर तणावपूर्ण शांतता होती. जिल्'ातील पोलीस पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले आहे. गावातून फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.दोन्ही व्यावसायिकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेचा कोणी जाणीवपूर्वक प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)संशयितांची नावे निष्पन्न करूजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत मुंबईत आहेत. या घटनेची त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली. ते म्हणाले की, किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला आहे. मात्र, त्याचा सोशल मीडियावरून कोणी प्रसार केला, वाहनांची मोडतोड कोणी केली, याचा तपास करून सर्वांची नावे निष्पन्न करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. या घटनेचे जिल्ह्यात कोठेही पडसाद उमटू नयेत, याची काळजी घेतली आहे.