शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

आटपाडीच्या नशिबात टंचाई लाभाचा दुष्काळ! खरीप पैसेवारीवर टंचाई घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:12 IST

सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा

ठळक मुद्देपीक कापणी प्रयोगाने केला घात

शरद जाधव ।सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा फटका आटपाडी तालुक्याला बसत आहे.बुधवारी शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र, टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही. रब्बी तालुका यादीत असलेला समावेश आणि खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाने आटपाडीचा घात केला आहे.

बुधवारी राज्य शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ जाहीर केलेल्या गावात मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर व जत तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या भागाइतकीच किंबहुना अधिक टंचाई परिस्थिती असलेल्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही.याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, खरीप हंगामात पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार त्या भागातील पैसेवारी ठरत असते. तो अहवाल शासनाला सादर करून टंचाई जाहीर होत असल्याचे सांगण्यात आले.आटपाडी तालुक्यात खरीप हंगामावेळी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. त्यावेळी तेथील पैसेवारी ५० पैशांपेक्षा जादा लागल्यानेच दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. 

शास्त्रोक्त पध्दतीने पीक कापणी प्रयोग घेतले जातात, त्यानंतरच पैसेवारी ठरविली जाते. यासंदर्भात शासनाची तत्त्वे आहेत. आटपाडी तालुक्यात रब्बीच्या गावांची संख्या जास्त आहे. जाहीर झालेल्या गावांमध्ये आटपाडीचा समावेश नसला तरी तालुक्यातील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.- विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारीदुष्काळ जाहीर केलेल्या यादीत आटपाडी तालुक्याचा समावेश नाही, हे अन्यायकारक असून, याविरोधात आवाज उठविणार आहे. शासनदरबारी प्रयत्न करून आटपाडीचा समावेश करण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवे होते. त्यांचे अपयश दिसून येत आहे. कामाचे जसे श्रेय आमदार घेतात, तसे या अन्यायाचेही श्रेय त्यांनी घ्यावे. तालुक्यात टंचाई असतानाही लाभ मिळणार नाहीत, यास आमदार जबाबदार आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष, आटपाडी

टॅग्स :Sangliसांगलीfarmer suicideशेतकरी आत्महत्या