शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

आटपाडी तालुक्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले-वर्षभरातील स्थिती : १९ टक्के गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:43 IST

तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या

ठळक मुद्देगतवर्षाच्या तुलनेतही गुन्ह्यांचा आलेख वाढल्याने पोलीस प्रशासनासमोर चिंता

अविनाश बाड ।आटपाडी : तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या तुलनेत ही आकडेवारीही वाढल्याचे दिसत आहे. वर्षात दर ४ ते ५ दिवसांतून एका निर्भयाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.

आटपाडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये एकूण ३८९ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी, जबरी चोरी असे सगळे गुन्हे नोंदविण्यात आले. पण यामध्ये ७४ गुन्हे हे केवळ महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे दाखल झाले आहेत. २०१७ या वर्षाच्या तुलनेत २०१८ या एका वर्षात तालुक्यात महिला आणि मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. ही संख्या केवळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घटनांची आहे. अब्रू वेशीवर टांगायला नको, गरिबी आणि पुढाऱ्यांनी मिटविलेल्या प्रकरणांचा आकडा खूपच मोठा असण्याची शक्यता आहे.

दि. ३ जानेवारी २०१८ रोजी गळवेवाडी येथील प्रतीक्षा या ८ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून केलेल्या तिच्या खुनाची घटना राज्यभर गाजली.तालुक्यात गेल्यावर्षी विवाहित महिलांसह अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ वी ते १० वीच्या आणि महाविद्यालयातील युवतींवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या तुलनेत अल्पवयीन मुलींवर होणाºया अत्याचाराचे प्रमाण या वर्षभरात कमालीचे वाढले आहे.पोलिसांचे लॉजवरील कारवाईकडे दुर्लक्ष!आटपाडी तालुक्यात लॉजची संख्या वाढली आहे. इयत्ता १० वीत शिकणाºया मुलीला शाळेच्या गणवेशात घेऊन आलेल्या नराधमाला दिघंचीत लॉजमध्ये सकाळी ११ वाजता खोली देण्यात आली. त्यामुळे तिथे त्या मुलीवर अत्याचार झाला. आटपाडीतल्या अनेक लॉजवर पोलिसांनी पाळत ठेवून कारवाई केली, तर अनेक घटना रोखल्या जाऊ शकतात. प्रत्यक्षात लॉजवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच गुन्हे करणाºयांना लॉजची सुरक्षितता वाटू लागली आहे. 

आटपाडी तालुक्यात महिला आणि बालकांच्या, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. या नवीन वर्षात असे गुन्हे घडू नयेत यासाठी शाळा-महाविद्यालयांत आम्ही प्रबोधन करीत आहोत. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, प्रबोधन करीत आहोत.- आप्पासाहेब कोळी, पोलीस निरीक्षक, आटपाडीसमाजाचा स्तर खालावत चालला आहे. मुलांवर होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत. विचारांची पातळी एवढी खालावली आहे की, मुलींचे वयही नराधम पाहत नाहीत. आई-वडिलांनी मुलांना काय-काय खबरदारी घ्यायची, हे घरीच सांगितले पाहिजे. मुली गाफील राहिल्या, तर हे प्रमाण वाढतच जाईल.- अ‍ॅड. अनघा कुलकर्णी, अध्यक्षा, महिला संरक्षण समिती, आटपाडी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली