शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सांगली जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिकिंग करून विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:58 IST

शेतकऱ्यांची लूट : कृषी विभाग सुस्त

दत्ता पाटीलतासगाव : जिल्हयात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर काही कृषी दुकानातून अन्य खते लिंकिंग करून विकली जात आहेत. शेतकऱ्यांच्या राजरोसपणे लूट होत असताना कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.एकट्या तासगाव तालुक्यात ९२ परवानाधारक खत विक्रेते आहेत. यातील काही परवानाधारक विक्रेत्यांकडे युरियाचा तुटवडा आहे. तर काही विक्रेत्यांकडे युरियाचा साठा शिल्लक आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील खत दुकानात ८३५ युरिया शिल्लक आहे. प्रत्यक्षात मात्र गरज असताना देखील अनेक दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई करण्यात आली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे, मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाचा चांगला पेरा झाला आहे. रब्बी हंगामात युरियाची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. मात्र, खत विक्रेत्यांकडून खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. काही मोजक्या खत दुकानात युरिया उपलब्ध आहे. मात्र, या दुकानदारांकडून प्रती पोत्यामागे ३० ते ५० रुपये ज्यादा दराने विक्री केली जात आहे.तर अनेक खत विक्रेत्यांकडून युरिया हवा असेल, तर नॅनो युरिया, नॅनो डीएपी, ऍझोला, बायोला आणि १९ : १९ : १९ या खतांचे लिंकिंग करून सक्ती केली जाते. युरियासाठी काही शेतकऱ्यांना लिंकिंगद्वारे खत घेऊन नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऐन गरजेच्या वेळी एरिया उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष..दुसरीकडे तालुक्यात राजरोसपणे जादा दराने खत विक्री आणि लिंकिंगची विक्री सुरू असताना देखील तालुक्यातील कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराचे कृषी विभागाच्या अधिका-यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तासगाव तालुक्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर) - ९ हजार ४७२पेरणी झालेले क्षेत्र - १० हजार ३२२पेरणीची टक्केवारी - १०८.९७ टक्के

युरिया आणि डीएपीची मागणी असलेले क्षेत्र (हेक्टर)रब्बी ज्वारी - ३ हजार ९५२गहू - २ हजार ३४२मका - ७७७

शेतकऱ्यांना वाली कोण? यंदा पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी, गहू, मका या पिकांची पेरणी केली आहे. त्यामुळे यंदा तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त रब्बीचा पेरा झाला आहे. ऐन हंगामात गरजेच्या वेळी तालुक्यात युरियासह डीएपीची देखील टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या टंचाई आणि लुटीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी